2022 मध्ये हिंदी चित्रपटांसाठी फारसं चांगलं नाही. काही मोजके चित्रपट सोडले तर अनेक दिग्गज कलाकारांचे चित्रपट बॉक्स ऑफिसवर कमाई करण्यात अयशस्वी झाले आहेत. नुकत्याच काही दिवसांपूर्वी आमीर खान आणि करीना कपूरचा ‘लाल सिंह चढ्ढा’ चित्रपट प्रदर्शित झाला आहे. परंतु चित्रपट प्रदर्शित होऊन पाच दिवस होऊनही या चित्रपटाने 50 कोटींची कमाई देखील केलेली पाहायला मिळत नाही. इतकंच नाही तर अक्षय कुमारच्या ‘रक्षाबंधन’ चित्रपटाने देखील अजून 35 कोटींची कमाई सुद्धा केलेली नाही.
मागील अनेक दिवसांपासून सोशल मीडियावर या चित्रपटांवर बहिष्कार टाकण्याची मागणी केली जात आहे. दरम्यान, याबाबत सध्या बॉॉलिवूडमधील अनेक दिग्गज मंडळी आपलं मत मांडत आहेत. अशातच आता अभिनेत्री तब्बूने देखील एका इंटरव्यूमध्ये याबाबत आपलं मत मांडलं आहे.
मला काहीही फरक पडत नाही…तब्बू
View this post on Instagram
नुकत्याच पार पडलेल्या एका इंटरव्यू दरम्यान, तब्बूला चित्रपटांवरील बहिष्काराबाबत प्रश्न विचारण्यात आला. त्यावेळी ती म्हणाली की, बॉक्स ऑफिसच्या कलेक्शनशी मला काहीही फरक पडत नाही. कारण चित्रपटांमध्ये तिचे पैसे लागलेले नसतात. तसेच ती म्हणाली की, चित्रपट फ्लॉप झाल्याने कोणचंही करिअर संपत नाही. परंतु जेव्हा चित्रपट चांगला चालतो तेव्हा तिला खूप आनंद होतो. मागील काही महिन्यांपूर्वी तब्बूचा भूल भुलैया २ मध्ये दिसून आली होती. या चित्रपटाने २०० कोटींची कमाई केली होती. तब्बूच्या करिअर मधील हा सर्वात हिट चित्रपट होता.
या चित्रपटांमध्ये दिसणार तब्बू
येत्या काळात तब्बू अजय देवगणसोबत ‘भोला’ आणि ‘दृश्यम’ चित्रपटांमध्ये दिसणार आहे. तसेच ती ‘वीरे दी वेडिंग’च्या सिक्वेलमध्ये दिसून येऊ शकते.