घरमनोरंजनबॉलिवूडमध्ये पाऊल ठेवल्यानंतर लोकांनी मारले असे टोमणे, काजोलने सांगितले आपले दु:ख

बॉलिवूडमध्ये पाऊल ठेवल्यानंतर लोकांनी मारले असे टोमणे, काजोलने सांगितले आपले दु:ख

Subscribe

बॉलिवूड मधील प्रसिद्ध अभिनेत्री काजोल हिने ३१ वर्षांपूर्वी १९९२ मध्ये बेखुदी सिनेमातून अभिनयाच्या जगात पाऊल ठेवले होते. त्यावेळी तिचे वय केवळ १७ वर्ष होते. तिचा १९९३ मध्ये प्रदर्शित झालेला बाजीगर सिनेमामुळे जबरदस्त यश मिळाले. यामध्ये शाहरुख खानने सुद्धा तिच्यासोबत मुख्य भुमिकेत काम केले होते. त्यानंतर काजोलने कधीच मागे वळून पाहिले नाही. परंतु काही लोक बदलत्या काळानुसार पुढे गेलेच नाहीत. लोक आधी सुद्धा आणि आता ही त्वचेच्या रंगावरुन टोमणे मारतात. तसेच गोरं दिसण्यासाठी सर्जरी केलीय असे ही म्हटले जाते. याच बद्दल काजोलने उघडपणे भाष्य केले आहे. तिने असे म्हटले की, तिला ती स्वत: सुंदर दिसतेय हे सांगण्यातच खुप स्ट्रगल करावा लागला.

एका चॅट शोमध्ये काजोलने असे म्हटले होते की, तिला सावळी आणि जाडी असे म्हटले जायचे. ती नेहमीच चष्मा लावायची. तिला आपण कोण आहोत, त्या लोकांपासून आपण किती वेगळे आहोत किंवा तिच्याबद्दल काय निगेटिव्ह कमेंट्स केल्या जात आहेत हे तिला माहिती होते.

- Advertisement -

काजोलने हे मान्य केले की, आपल्या त्वचेच्या रंगावरुन तिला फार स्ट्रगल करावा लागला की, ती खरंच सुंदर दिसते. तिने असे म्हटले की, जेव्हा ती जवळजवळ ३२-३३ वर्षाची होती तेव्हा तिने आरश्यात पाहण्यास सुरुवात केली आणि आपण स्वत: किती सुंदर दिसतोय हे तिला कळले.

दरम्यान, एका जुन्या मुलाखतीत काजोलने तिने स्किन व्हाइटनिंग सर्जरी केल्याच्या गोष्टीला नकार दिला. तेव्हा मजेशीर उत्तर देत असे म्हटले होते की, आता ती उन्हापासून दूर राहत आहे. तिने असे ही म्हटले होते की, तिने आपल्या आयुष्याची १० वर्ष उन्हात काम केले होते. त्यामुळे टॅनिंगची समस्या उद्भवली होती.

- Advertisement -

 


हेही वाचा: Wow किती गोंडस बाळ… मालती मेरीच्या इस्टरचे सुंदर फोटो पाहून चाहत्यांनी दिली प्रतिक्रिया

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -