घरमनोरंजन...पण एका महिलेला विसरू नका, खलिस्तानी दहशतवादावर कंगनाची नवी पोस्ट

…पण एका महिलेला विसरू नका, खलिस्तानी दहशतवादावर कंगनाची नवी पोस्ट

Subscribe

बॉलिवूडची पंगा गर्ल अभिनेत्री कंगना रनौतने स्वातंत्र्याबाबत केलेल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे सध्या ती चर्चेचा विषय ठरली आहे. कंगनाने काही दिवसांपूर्वी “१९४७ साली भारताला मिळालेले स्वातंत्र्य हे स्वातंत्र्य नसून ती भीक होती’ असं वादग्रस्त विधान केले होते. मात्र या विधानवरून आता देशभरातून तिच्यावर टीकेची झोड उठवली जात आहे. यानंतरही तिने अनेक वादग्रस्त विधाने केली आहेत. अशातच कंगनाने आता स्वातंत्र्याचा मुद्दा बाजूला ठेवत खलिस्तानी दहशतवादाच्या मुद्यावर नवं विधान केलं आहे. कंगनाने काल केंद्रीय कृषी कायदे मागे घेण्याच्या पंतप्रधान मोदींच्या भूमिकेवर नाराजी व्यक्त केली. यानंतर कंगनाने लगेल खलिस्तानवादी दहशतवादाच्या मुद्द्याला हात घालत माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या खलिस्तानवादी दहशतवादाविरोधातील भूमिकेचे कौतुक केले आहे. या पोस्टमध्ये तिने देशाच्या माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांचा एक फोटो देखील शेअर केला आहे.

कंगनाची नवी फेसबुक पोस्ट

कंगनाने या पोस्टमध्ये लिहिले की, खलिस्तानी दहशतवादी आज सरकारचे हात पिरगळण्याचा प्रयत्न करत आहेत…..पण एका महिलेला विसरू नका…. या एकमेव महिला पंतप्रधानांनी त्यांना आपल्या चपलेखाली चिरडले होते…. त्यांनी या देशाला कितीही त्रास दिला असला तरी …..त्यांनी जीवाची बाजी लावून त्यांना डासासारखे चिरडले आहे…. पण देशाचे तुकडे होऊ दिले नाहीत….त्यांच्या मृत्यूनंतरही…. आजही त्यांच्या नावाने हे प्रकरण ओळखले जाते… त्याला एकच गुरू आहे… #repeaalfarmlaws… खलिस्तानी चळवळीच्या उदयाप्रमाणे त्यांची कहाणी देखील नेहमीपेक्षा अधिक समर्पक झाली आहे…..खूप लवकरच तुमच्यासाठी #Emergency आणत आहे.

- Advertisement -


त्यामुळे शेतकऱ्यांच्या मुद्द्यात आता कंगनाकडून काँग्रेसला अप्रत्यक्षरित्या ओढण्याचा प्रयत्न होत असल्याचे म्हटले जात आहे. अलीकडेच कंगनाने कृषी तीनही कायदे मागे घेण्याच्या सरकारच्या निर्णयावर नाराजी व्यक्त केली होती.
कंगनाने नाराजी व्यक्त करत लिहिले की, “दुःखद, लज्जास्पद आणि पूर्णपणे चुकीचं आहे… संसदेत बसणाऱ्या सरकारऐवजी आता रस्त्यावर बसलेले लोक कायदे बनवू लागलेत, तर हाही जिहादी देश आहे… अभिनंदन. जे हे सर्व करु इच्छितात.

याआधी कंगनाने महात्मा गांधींवर प्रश्नचिन्ह उपस्थित करून मोठा वाद निर्माण केला आहे. कंगना रानौतने तिच्या सोशल मीडियावर एक लांबलचक पोस्ट टाकत गांधींबद्दल वादग्रस्त वक्तव्य केले होते. तिच्या पहिल्या पोस्टमध्ये, तिने गांधींना सत्तेचे भुकेले आणि धूर्त असल्याचे म्हटले होते, तर दुसऱ्या पोस्टमध्ये तिने लिहिले होते की, महात्मा गांधींचीच इच्छा होती की, भगतसिंगांना फाशीची शिक्षा व्हावी. इतक्यावर ती थांबली नाही तर अनेक टीका तिने यावर केल्या आहेत.

- Advertisement -

 

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -