घरमनोरंजनबॉलिवूडचा किंग खान झाला भावूक

बॉलिवूडचा किंग खान झाला भावूक

Subscribe

दिल्लीला कसं विसरु तुम्हीच सांगा असे म्हणत शाहरुख ने दिल्लीशी असलेलं त्याचं नातं स्पष्ट केलं.

बॉलिवूडचा बादशाह म्हणजेच शाहरुख खान याचा ‘स्ट्रगलर ते किंग खान’ असा प्रवास त्याला मुंबईने घडवून दिल्याचं तो नेहमीच सांगत असतो. मुंबईसारख्या मायानगरीत प्रत्येकजण आपलं नशीब आजमावण्यासाठी येतात. शाहरुखही त्याच्यापैकीच एक आहे. मात्र मुंबईपेक्षा राजधानी दिल्लीवर त्याचं जास्त प्रेम आहे. यामागील कारणंही तितकंच म्हत्वाचं आहे. शाहरुख हा सध्या त्याच्या ‘पठाण’ या चित्रपटाच्या चित्रिकरणाचं काम करत आहे. या चित्रपटातून स्वत:साठी वेळ काढून शाहरुख दिल्लीचा दौरा करण्यासाठी गेला होता.

दिल्लीत तो आपल्या आईवडिलांच्या कबरीला भेट द्यायला गेला असल्याचं एका फोटोतून समोर आलं आहे. याआधीही हितगुज साधताना शाहरुखने सांगितले होते की, ”दिल्लीला जेव्हा मी जातो तेव्हा मला माझे आईवडील जवळ असल्याचा भास होतो. मुंबईत बरेच दिवस असल्यानं तु पक्का मुंबईचा माणूस झाला आहेस असे लोक म्हणतात, पण माझे आईवडीलांच्या आठवणी असलेल्या दिल्लीला मी कधीही सोडू शकणार नाही. अशा शब्दात शाहरुखने त्याच्या भावना व्यक्त केल्या आहेत. शाहरुखचे वडील पेशाने अभियंत होते. मात्र शाहरुख कॉलेजमध्ये असतानाच त्यांचा कॅन्सरसारख्या दुर्धर आजाराने मृत्यू झाला. यानंतर १९९० मध्येही शाहरुखच्या आईचा मृत्यू झाला होता. या सर्व प्रसंगानंतर शाहरुखने बॉलिवूडमध्ये नशीब आजमविण्याचा निर्णय घेतला आणि तो बॉलिवूडचा किंग खान झाला. मात्र अजूनही दिल्लीशी असलेली त्याची नाळ अजून ही तुटलेली नाही.

- Advertisement -

हे वाचा- रश्मिका मंदानाचे बॉलिवूडमध्ये पदार्पण, सिद्धार्थ मल्होत्रा सोबत दिसणार या चित्रपटात

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -