भारताची गानकोकीळा, गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांच्या निधनाने संपूर्ण देश शोक सागरात बुडाला आहे. बॉलीवूड इंडस्ट्रीमधील अनेक दिग्गज या धक्क्यातून अजूनही सावरले नाहीत. यात ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांचाही समावेश आहे. लतादीदी आणि धर्मेंद्र यांच्यात जिव्हाळ्याचे नाते होते. पण असे असतानाही लतादीदींचे अंतिम दर्शन घेण्यासाठी तीन वेळा तयार झालेले धर्मेंद्र जाऊ शकले नाहीत.
याचे कारण स्वत: धर्मेंद्र यांनी एका इंग्रजी वृत्तपत्राशी बोलताना सांगितले आहे. लतादीदी गेल्याचे कळताच अनेकजणांप्रमाणेच धर्मेंद्र यांनाही जबर धक्का बसला होता. लतादीदींच्या जाण्याने ते व्यथित झाले. पण तरीही स्वता:ला सांभाळत दीदींचे अंतिम दर्शन घेण्यासाठी ते एक, दोन नाही तर तीनवेळा तयार झाले. पण लतादीदींना आम्हांला असं सोडून जाताना बघणे क्लेशदायी होते. ते मी बघू शकत नव्हतो. म्हणून तयार असूनही मी नाही गेलो. पण तेव्हापासून माझीही तब्येत बिघडली असून मी खूप व्यथित असल्याचे त्यांनी सांगितले.
६ फेब्रुवारीला सकाळी लतादीदींचे निधन झाल्यानंतर अनेक दिग्गजांनी लतादीदींनी सोशल मीडियावर श्रद्धांजली वाहीली होती. धर्मेंद्र यांनीही लतादीदींना श्रद्धांजली वाहत दोघांचा एकत्र फोटो शेअर केला होता. या फोटोखाली त्यांनी तुमच्या जाण्याने संपूर्ण जग तुम्हांला मिस करत आहे. तुम्ही आम्हांला सोडून गेल्या आहात यावर माझा अजूनही विश्वास बसत नाहीये. असे धर्मेंद्र यांनी म्हटले होते. तसेच तुमच्या आत्म्यास शांती मिळो अशी श्रद्धांजलीही धर्मेंद्र यांनी वाहीली होती.
Lata ji , an affectionate 🤗 sister who is always concerned🥰……Friends love ❤️ you for your loving response 🙏 pic.twitter.com/MSvv6OhwNY
— Dharmendra Deol (@aapkadharam) June 21, 2020
धर्मेंद्र यांनी २०२० मध्ये सोशल मीडियावर लता दीदींचे आभार व्यक्त करणारी पोस्ट लिहली होती. यात त्यांनी त्यांचा एक व्हिडीओ शेअर केला होता. त्यात लता दीदींनी त्यांना एक पोर्टेबल म्युझिक प्लेयर गिफ्ट दिला असून त्यात त्यांची गाणी असल्याचे धर्मेंद्र यांनी म्हटले होते.
गेल्यावर्षीही धर्मेंद्र यांनी एक ट्विट केल होते. ते बघितल्यावर लतादीदींना वाटले की धर्मेंद्र तणावात आहेत. यामुळे त्यांनी धर्मेद्र यांना फोन केला. त्यानंतर दोघेजण तासभर गप्पा मारत होते. धर्मेंद्र यांनी अभिनय केलेल्या बऱ्याच चित्रपटात लतादीदींनी गाणी गायिली होती. जी आजही लोकप्रिय आहेत.
लतादीदीं स्वभावाने प्रेमळ आणि शांत होत्या. त्यांना त्यांच्या कुटुंबाची जेवढी काळजी असायची तेवढीच काळजी त्यांना त्यांच्याजवळील माणसांचीही वाटायची. यामुळे कधी कोणाबद्दल काही कळलं तर त्या स्वत:हून फोन करून त्या व्यक्तीची चौकशी करायच्या. मदत लागली तर मदतही करायच्या. यामुळे लतादीदीं सगळ्यांनाच जवळच्या वाटायच्या.