टेलिव्हिजन विश्वात प्रसिद्ध झालेल्या महाभारतात (Mahabharat Serial ) श्री कृष्णाची (Shree Krishna ) भूमिका साकारणारे मराठी अभिनेते नितीश भारद्वाज ( Nitish Bhardwaj) यांनी आपला संसार दुसऱ्यांदा मोडला. नितीश भारद्वाज आणि त्यांची पत्नी स्मिता गाते (Smita Gate) यांनी घटस्फोट घेतला. (Nitish Bhardwaj Smita separated) लग्नाच्या 12 वर्षांनंतर दोघांनी हा निर्णय घेतला आहे. त्यांनी दोन मुली आहे. ही माहिती स्वत: नितीश भारद्वाज यांनी दिली असून सध्या त्यांच्या पत्नी स्मिता या इंदौर येथे दोन मुलींसोबत राहत आहेत. दरम्यान नितीश भारद्वाज यांनी माध्यमांशी बोलताना आपल्या भावना व्यक्त केल्यात. त्यांच्या या मोठ्या निर्णयाने त्यांचे चाहते फार नाराज झाले आहेत.
घटस्फोट मृत्यूपेक्षा वेदनादायी
अभिनेते नितीश भारद्वाज यांनी बॉम्बे टाइम्सला दिलेल्या माहितीनुसार, पत्नी स्मिता यांच्यासोबत न राहण्याचा निर्णय त्यांनी घेतला आहे. मुंबईच्या फॅमिली कोर्टात सप्टेंबर 2019मध्ये त्यांनी घटस्फोटोसाठी निवेदन दिले होते. आमच्या नात्याचा शेवट का झाला याच कारण सांगण्याइतका खोलात मी जाणार नाही. कारण हा प्रश्न सध्या कोर्टात सुरू आहे. मी केवळ इतकेच म्हणू शकतो की जेव्हा तुम्ही एकट्याने आयुष्य जगत असता तेव्हा कधी कधी घटस्फोट हा मृत्यूपेक्षा वेदनायी वाटतो.
मी भाग्यवान राहिलो नाही
नितीश भारद्वाज यांनी पुढे असे म्हटले की, माझा लग्न संस्थेवर विश्वास आहे. मात्र मी कमनशीबी आहे. लग्न तुटण्याची अनेक कारणे असू शकतात. कधी कधी उदासीनता किंवा सहानुभूतीच्या अभावामुळे होते किंवा तुमच्यात असलेला गर्विष्ठपणाचा हा झालेला परिणाम असू शकतो. त्यामुळे एक लक्षात ठेवा नेहमी स्वत: बद्दल विचार करा. पण जेव्हा कुटुंब तुटते तेव्हा त्याचा सर्वात जास्त हा मुलांना होतो. त्यामुळे अशा वेळी आई वडिलांनी ही गोष्ट लक्षात ठेवावी की मुलांवर याचा कोणताही परिणाम होणार नाही याची जबाबदारी आपली असेल.
पत्नी स्मिता मेसेजचे उत्तर देत नाही
मुलाखतीतील पुढच्या प्रश्नाचे उत्तर देताना नितीश म्हणाले, माझे मुलींशी बोलणे होते का याविषयी मी कधीच काहीही बोलू इच्छित नाही. मी अनेक वेळा मुलींशी बोलण्यासाठी स्मिताला मेसेज केला मात्र तिने माझ्या मेसेजला उत्तर दिले नाही.
दुसऱ्यांदा घटस्फोट
अभिनेते नितीश भारद्वाज यांचे हे दुसरे लग्न होते. मात्र ते ही 12 वर्षांनी मोडले आहे. नितीश यांचे पहिले लग्न 1991मध्ये मोनिशा पाटील यांच्याशी झाले. त्यांना एक मुलगा आणि एक मुलगी आहे. मात्र त्याचे नाते काही वर्षच टिकले आणि 2005मध्ये त्यांनी घटस्फोट घेतला. त्यानंतर 1992च्या बॅचच्या ( मध्य प्रदेश कॅडर ) आयएएस ऑफिसर स्मिता गाते यांच्याशी 2009मध्ये लग्न केले त्यांना दोन जुळ्या मुली आहेत. मात्र हे नातेही आता संपुष्टात आले.
हेही वाचा – Dhanush Aishwarya Seprated : धनुष ऐश्वर्याचा घटस्फोट, विभक्त होण्याचा ट्विटरवर केला खुलासा