घरमनोरंजनतरूणांच्या मनातला विषय घेऊन येत आहे ‘मन फकीरा’!

तरूणांच्या मनातला विषय घेऊन येत आहे ‘मन फकीरा’!

Subscribe

सुव्रत जोशी, सायली संजीव, अंजली पाटील आणि अंकित मोहन यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या सिनेमाचा ट्रेलर नुकताच सोशल मिडीयावर प्रदर्शित करण्यात आला.

आजच्या तरुणाईच्या संकल्पना, भावना यातून आकाराला आलेला, तरुणाईनेच साकारलेला आणि तरुणांच्या हृदयाला चटकन भिडेल असा चित्रपट असे ज्याचे वर्णन केले जाते आहे तो ‘मन फकीरा’ ६ मार्च रोजी सर्वत्र प्रदर्शित होत आहे. लोकप्रिय अभिनेत्री मृण्मयी देशपांडे हिचे दिग्दर्शन असलेला पहिला आणि आजच्या आघाडीच्या लोकप्रिय कलाकारांनी साकारलेला हा मराठी चित्रपट सध्या चित्रपटसृष्टीत चर्चेचा विषय ठरला आहे. सुव्रत जोशी, सायली संजीव, अंजली पाटील आणि अंकित मोहन यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या सिनेमाचा ट्रेलर नुकताच सोशल मिडीयावर प्रदर्शित करण्यात आला.

‘मन फकीरा’ या रोमँटिक ड्रामाच्या गेल्या काही आठवड्यांमध्ये प्रदर्शित झालेल्या पोस्टर, टीझर आणि गाण्यांना मराठी प्रेक्षकांनी भरभरून प्रतिसाद दिला आहे. आज प्रदर्शित झालेल्या या ट्रेलरमधून आपल्याला दोन जोडप्यांमधील वेगळ्या व्यक्तीबद्दल असलेले प्रेम बघायला मिळत आहे. ‘प्रेम…आहे, नाही, बहुतेक, वगैरे…’ ही या सिनेमाची टॅगलाईन असून तिच्याबाबत उत्कंठा लागली असतानाच नव्याने प्रदर्शित झालेला ट्रेलर या टॅगलाईनबद्दल हलकासा खुलासा करतो. ‘एखाद्या माणसांवर आपलं प्रेम असतं, पण दुसऱ्या एका माणसाबद्दल सॉफ्ट कॉर्नर तयार होऊ शकतो’, ‘हळव्या हाताने सोडवलं तर सुटेलही कदाचित’ यांसारख्या दमदार संवादानी हा ट्रेलर आपलं लक्ष वेधतो.

- Advertisement -

प्रेमात पडलाय… लग्नासाठी स्थळ आलंय… लग्न ठरलं… लग्न झालंय… अशा प्रकारचा आशय या ट्रेलरमधून समोर येतो. भूषण-रिया यांचे मराठमोळ्या ‘कांदापोहे’ पद्धतीने लग्न होते आणि त्यानंतर सगळे काही सुरळीत सुरु असताना एका रात्री या दोघांचेही भूतकाळ समोर येतात. हे दोघे या सर्व गोष्टीला कसे समजुतदारणे सामोरे जातात आणि पुढे नक्की काय निर्णय घेतात… हे पाहण्यासाठी प्रदर्शित होणाऱ्या चित्रपटाची वाट पहावी लागणार आहे. पण या ट्रेलरमधून प्रेक्षकांची उत्सुकता वाढली आहे, हे नक्की!

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -