घरमनोरंजनस्वप्निल जोशी आणि मुक्ता बर्वेने सांगितले धम्माल किस्से

स्वप्निल जोशी आणि मुक्ता बर्वेने सांगितले धम्माल किस्से

Subscribe

'अस्सल पाहुणे इरसाल नमुने' या कार्यक्रमात महाराष्ट्राचे लाडके दोन कलाकार स्वप्निल जोशी आणि मुक्ता बर्वे यांनी देखील बरीच धम्माल केली आहे. यावेळी या दोघांने अनेक किस्से शेअर केले आहेत.

कलर्स मराठीवरील ‘अस्सल पाहुणे इरसाल नमुने’ कार्यक्रमामध्ये या आठवड्यामध्ये लोकप्रिय मालिका ‘बाळूमामाच्या नावानं चांगभलं’ मधील कलाकार हजेरी लावणार आहेत. तसेच या कार्यक्रमामध्ये महाराष्ट्राचे लाडके दोन कलाकार स्वप्निल जोशी आणि मुक्ता बर्वे यांनी देखील बरीच धम्माल केली असून काही अनुभव, आणि प्रेक्षकांना माहिती नसलेले किस्से देखील सांगितले आहेत. प्रेक्षकांना माहित नसलेले अनेक किस्से देखील त्यांनी सांगितले आहेत. हे किस्से अनुभवाचे असल्यास येणाऱ्या विशेष भागात गुरुवारी आणि शुक्रवारी रात्री ९.३० वाजता कलर्स मराठीवर पाहता येणार आहे.

- Advertisement -

स्वप्निल आणि मुक्ताचे किस्से

स्वप्निल जोशीने त्याचा रामानंद सागर यांच्याबरोबचा किस्सा सांगितला तर त्याची या क्षेत्रामध्ये एन्ट्री कशी झाली हे देखील त्यांने सांगितले आहे. मुक्ता आणि स्वप्निल यांनी अंकुश चौधरी, सह अभिनेत्री सोनाली कुलकर्णी – सई ताम्हणकर तसेच सतीश राजवाडे यांच्याबद्दल एक आवडती आणि एक खटकणारी गोष्ट देखील सांगितली आहे. आता हे किस्से आणि या गोष्टी काय आहेत हे तुम्हाला या आठवड्यामध्ये कळणार आहेत.

बाळूची निवड कशी झाली?

‘बाळूमामाच्या नावानं चांगभलं’ मधील बाळूची भूमिका साकारणाऱ्या समर्थला मकरंदला विचारले मालिकेमध्ये तुझी निवड झाली तेंव्हा घरच्यांची काय प्रतिक्रिया होती? त्यावर समर्थ म्हणाला बाबांना आवडले नाही आणि ते म्हणाले नको करू. पण माझ्या मामांनी मला प्रोत्साहन दिले. पण यानंतर समर्थला अश्रू अनावर झाले. नेमके काय घडले? हे प्रेक्षकांना लवकरच कळणार आहे. तसेच मालिकेच्या सेटवर कलाकारांची प्राण्यांशी चांगलीच मैत्री झाली आहे. मालिकेमध्ये सत्यवाची भूमिका साकारणारी साजरी हिने प्रत्येक प्राण्याला एक खास नाव ठेवले आहे. गाईचे नाव तांबडी आणि कपिला तांबडीचं वासरू आहे जे खूपच गोंडस आहे त्याच नाव चिंगु ठेवले आहे. त्याचप्रमाणे घोड्याचे नाव राजा आणि घोडीचे परी नाव आहे. तर गाढव देखील आहे त्याचे नाव सगळ्यात खास आहे ‘गधा भाई’.

- Advertisement -

बाळूमामांच्या मेंढ्याना हात लावणे कठीण

बाळूमामाच्या नावानं चांगभलं या मालिकेच्या शूट दरम्यान आलेला एक अद्भुत किस्सा देखील यावेळेस सांगण्यात आला. अचानक शूटच्या दरम्यान मेंढ्या गायब झाल्या होत्या. त्यांना खूप शोधले तरी त्या मिळाल्या नाही. पण दुसऱ्या दिवशी मात्र त्या सगळ्या मेंढ्या सेटवर परतल्या. या घटनेनंतर कळाले कि, जंगलामध्ये ज्याठिकाणी या मेंढ्या होत्या त्या परिसरामध्ये बिबट्याचा वावर असतो. परंतु त्या बाळूमामाच्या मेंढ्या असल्याने त्यांना काहीच झाले नाही आणि त्या सुखरूप परतल्या. त्यावर संतोष अयाचित म्हणाले, ज्या मामांनी आम्हाला मेंढ्या आणि इतर प्राणी पाठवले त्यांना मी फोन केला आणि त्यांना सांगितले कि, आम्ही मेंढ्याची काळजी नाही घेऊ शकलो त्यावर ते म्हणाले, ‘काही काळजी करू नका. त्या बाळूमामांच्या मेंढ्या आहेत त्यांना हात लावण इतक सोप नाही हा खरोखरच एक चमत्कार आहे असं म्हणावं लागेल. तसेच प्रत्येक कलाकाराला त्यांच्या खऱ्या आयुष्यातील बाळूमामा कोण? असा प्रश्न देखील यावेळी विचारण्यात आला.


वाचा – ‘मुंबई पुणे मुंबई-३’मध्ये ‘पिंजरा’ चित्रपटातील गाण्याचे प्रकाशन


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -