मलायका खान आणि अर्जुन कपूर हे दोघे एप्रिल महिन्यात लग्न करणार असल्याच्या बातमीचे अर्जुनचे वडिल आणि दिग्दर्शक बोनी कपूर यांनी खंडन केले आहे. अर्जुनच्या लग्नाबद्दल बातम्या खोट्या असल्याचे त्यांनी सांगितले आहे. मलायका आणि अर्जुन मागील अनेक महिन्यांपासून प्रेमसंबधात आहेत. यांचे लग्न कधी होते याबद्दल फॅन्समध्ये उत्सुकता आहे. मलायका आणि अर्जुन १९ एप्रिल रोजी लग्न करणार असल्याची माहिती स्पॉटबॉय या वेबसाइटने दिली होती. मात्र ‘अमज उजाला’या वृत्तसंस्थेला बोनी कपूर यांनी दिलेल्या मुलाखातीमध्ये बोनी कपूर यांनी या बातमीचे खंडन केले आहे.
अशी उडली होती अफवा
मलायका आणि अर्जुनचा लग्न पुढील महिन्यात होणार असल्याचे सांगण्यात आले. स्पॉटबॉय या वेबसाइटने दिलेल्या वृत्ताप्रमाणे १९ एप्रिल रोजी हे दोघे लग्न करणार होते. या लग्नाचे आमंत्रण फक्त जवळील मित्र आणि नातेवाईकांना दिले जाणार असल्याचे सांगण्यात आले होते. स्पॉटबॉयने दिलेल्या माहितीनुसार या लग्नाला अभिनेत्री करीना कपूर, करिश्मा कपूर, अमृता अरोरा यांना लग्नाचे आमंत्रण देण्यात आले होते. मात्र याबद्दल या दोघांनीही कोणती अधिकृत घोषणा केलेली नव्हती.