कारगिल युद्धात शहीद झालेले परमवीर चक्र विजेते कॅप्टन विक्रम बत्रा यांच्या जीवनावर आधारित ‘शेरशाह’ चित्रपटाने लोकांची मने जिंकली आहेत. यामुळे ‘शेरशाह’ चित्रपटाची चांगलीच चर्चा सुरू आहे. चित्रपटातील मुख्य भूमिका साकारणारा अभिनेता सिद्धार्थ मल्होत्राच्या अभिनयाची चाहते आणि समीक्षक तितकेच कौतुक करत आहेत. या चित्रपटातील काही क्षण पाहून प्रेक्षकांना अश्रू अनावर झालेत. त्यामुळे २०२१ मधील ‘शेरशाह’हा ब्लॉकबस्टर चित्रपट असल्याचे म्हटले जात आहे. परंतु या चित्रपटातील विक्रम बत्रा यांच्या भूमिकेसाठी सलमान खानची जीजू आयुष शर्माला अधित पसंती होती.
शेरशाह चित्रपटाचे निर्माते शब्बीर बॉक्सवाला यांनी एका मुलाखतीत सांगितले की, आयुष शर्माने या चित्रपटातील कॅप्टन विक्रम बत्रा यांची भूमिका साकारावी अशी सलमानची इच्छा होती. मात्र या चित्रपटाचे अधिकार कॅप्टन विक्रम बत्रा यांच्या कुंटुबियांकडे असल्याने त्यांनी अभिनेता सिद्धार्थ मल्होत्राच्या नावाला पसंती दिली. जेव्हा या चित्रपटाची स्क्रिप्ट लिहिली जात होती तेव्हा सलमान खान या चित्रपटाची निर्मिती करु इच्छित होता.
View this post on Instagram
निर्माते शब्बीर बॉक्सवाला पुढे सांगतात, बत्रा कुंटुबियांच्या विरोधात जाऊन अभिनेता सिद्धार्थ मल्होत्राला या चित्रपटातून काढणे त्यांच्यासाठी अवघड होते. तो क्षण त्यांच्यासाठी अधिक महत्त्वाचा होता. कारण बत्रा कुटुंबियांनी त्यांच्यावर एक जबाबदारी सोपवली होती, त्यामुळे त्यांच्याकडून कोणतीही चुक होऊ नये असे त्यांना वाट होते. यासाठी सलमानला त्यांनी समजावले.
सिद्धार्थ मल्होत्राचा ‘शेरशाह’ ठरला ब्लॉकबस्टर