राज्यातील बदललेल्या राजकारणावर जनसामान्यांपासून राजकीय विश्लेषकांपर्यंत सर्वच जण आपापली मतं व्यक्त करत आहेत. यातच आता अभिनेत्री राखी सावंत हिनेसुद्धा राज्यातील सत्तास्थापनेबाबत मोठा खुलासा केला आहे. या बाबतचा व्हिडीओ तिने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला आहे.
काय म्हणाली राखी सावंत?
राखीनं तिच्या व्हिडीओमध्ये म्हटलं की, “मी उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांना एकमेकांशी भांडण करु नका असा सल्ला दिला होता. तसेच लवकरात लवकर सरकार स्थापन करा, असेही सांगितले होते. परंतु त्यांनी माझे ऐकले नाही. आता बघा, अमित शाह यांनी शरद पवार यांना फोन करुन उद्धव ठाकरे यांचे सरकार स्थापनेचे सर्व मार्गच बंद करुन टाकले. या सर्व प्रकरणामागे मास्टर माईंड अमित शाह यांचा हात आहे.”
दरम्यान, वादग्रस्त वक्तव्यांमुळे राखी नेहमीच चर्चेत राहते. आता तर तिने भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांना मास्टर माईंड म्हटले आहे. तेव्हा पुन्हा एकदा राखी सावंतला नेटकऱ्यांच्या टिकेला, ट्रोलला सामोरे जावे लागण्याची शक्यता आहे.