अभिनेत्री आलिया भट्ट (Alia Bhatt ) आणि अभिनेता रणबीर कपूर (Ranbir Kapoor) बॉलिवूडमधील ही जोडी प्रचंड चर्चेत आहे. या दोघांच्या लग्नाच्या चर्चा होत आहे. मात्र या दोघांनी अद्यापही याबद्दल खुलासा केला नाही. रणबीर आलियाची जोडी प्रेक्षकांना खूप आवडते. त्यामुळे प्रेक्षक हे दोघे कधी लग्नाबंधनात अडकणार यांची वाट पाहत आहे. हे दोघे एप्रिल महिन्यामध्ये लग्न (married) करणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला होता. तसेच या बहुप्रतिक्षित लग्नाबाबत रोज नव-नवीन माहिती समोर येत असते. मात्र आता यावर शिक्कामोर्तब होताना दिसत आहे.
View this post on Instagram
रणबीर आणि आलिया हे एप्रिल (April) म्हणजे या महिन्यात लग्न करणार असल्याचे एका माध्यमातून मिळालेल्या माहितीनुसार समजते आहे. यासाठी त्यांनी ठिकाण ठरवले आहे. हे कपल एका भव्य हॉटेल (Hotel) किंवा डेस्टिनेशवर (Destination) जाऊन लग्न करणार नसून ते त्याच्या घरी म्हणजे कपूर घराण्यातील वडीलोपार्जित असलेला आर. के. हाउसमध्ये (R. K. House) लग्न करणार आहेत. असा दावा एका एंटरटेनमेंट पोर्टलने केला आहे. विशेष म्हणजे याआधी रणबीरच्या आई वडिलांनी (Rishi Kapoor and Neetu Kapoor) 20 जानेवारी 1980 मध्ये आर. के. हाउसमध्ये लग्न केले होते.
View this post on Instagram
रणबीर आणि आलिया हे एप्रिलमधील दुसऱ्या आठवड्यात लग्नबंधनात अडकणार आहेत. या लग्नात 450 लोक उपस्थित राहणार आहे. कपूर कुटूंबीयांना हे लग्न एप्रिल अखेरला व्हावे असे वाटत होते. पण आलियाच्या आजोबांची (Narendranath Rajnath) प्रकृतीच्या कारणाने हे लग्न लवकर उरकले जात असल्याची माहिती सुत्रांकडून मिळाली आहे.
View this post on Instagram
लग्नाच्या तारखेबाबत विचारले असता रणबीर माध्यमांशी बोलताना म्हणाला की, ‘तारीख जाहीर करायला मला वेड्या कुत्र्याने चावले नाही. मी तुम्हाला एवढेच सांगेन की, आम्ही दोघे लग्नाचा विचार करत आहोत.’
View this post on Instagram
हेही वाचा – गिरीश कुलकर्णींचा ‘भिरकीट’ 17 जूनला प्रेक्षकांच्या भेटीस; पोस्टर आऊट