घरमनोरंजन'तीन महिन्यांपासून सुरू होती काळी जादू; सुशांतला मारतील असे कधी वाटले नव्हते'

‘तीन महिन्यांपासून सुरू होती काळी जादू; सुशांतला मारतील असे कधी वाटले नव्हते’

Subscribe

आज रियाचे वडील इंद्रजीत यांना माध्यमांच्या काही प्रश्नांचा सामना करावा लागला आहे. ज्या प्रश्नांवर रियाचे वडिल रागावल्याचे सांगितले जात आहे.

सुशांत सिंह प्रकरणात ईडी आणि सीबीआय रियासह कुटूंबाची देखील चौकशी करत आहेत. रिया चक्रवर्ती यांच्या वडिलांना आज ईडीने समन्स बजावला असून काही कागदपत्रांचे आदेशही देण्यात आले आहेत. आज रियाचे वडील इंद्रजीत यांना माध्यमांच्या काही प्रश्नांचा सामना करावा लागला आहे. ज्या प्रश्नांवर अभिनेत्रीचे वडील रागावल्याचे सांगितले जात आहे. या व्यतिरिक्त दोन महिलांनी रियाच्या सोसायटीमध्ये घुसून गोंधळ देखील घातला आणि चक्रवर्ती परिवारावर काळी जादू केल्याचा आरोपही त्यांनी केला.

रियाच्या कुटुंबावर काळी जादू केल्याचा आरोप

दरम्यान, या दोन्ही महिला खारच्या रहिवासी असून त्या महिला सुशांतच्या चाहत्या होत्या. त्या दोघीही रियाच्या सोसायटीमधील इमारतीत शिरल्या आणि रियाच्या आईवर काळी जादू केल्याचा आरोप करू लागल्या. दोघीही महिला रिया आणि तिच्या कुटूंबावर नाराज असून सुशांतच्या मृत्यूसाठी तिला दोषी ठरवत असल्याचे सांगण्यात येत आहे. या दोन्ही महिलांनी रियासह तिच्या कुटुंबावर हल्ला केला. यावेळी चांगलाच गोंधळ उडाला. त्यानंतर सुरक्षा रक्षकाने दोन्ही महिलांना बाहेर काढले.

- Advertisement -

दोन महिलांनी केला, काळी जादू केल्याचा आरोप

रियाच्या आईने काळी जादू करण्यासाठी पांढरी पावडर वापरल्याचा आरोप या महिलांनी केला. सुशांतवर ३ महिन्यांपासून काळी जादू झाली आहे. त्यांना रियाच्या कामवाल्या बाईकडून आणि शेजार्‍यांकडून काळ्या जादूबद्दल माहिती मिळाली होती. त्यांना माहित नव्हते तसेच, ते कधी सुशांतला ठार मारतील, असे वाटले नव्हते. तसेच त्यांनी रियाला पकडण्याची मागणी देखील केली आहे. यावेळी या दोन महिलांना काळ्या जादूबद्दल माहित होते तर त्या पोलिसांकडे का गेल्या नाहीत, असे विचारले गेले.


‘रिया माझ्या मुलाला विष देत होती, तिनेच हत्या केली’; सुशांतच्या वडिलांचा आरोप


यावर उत्तर म्हणून त्यांनी असे सांगितले की, – “पोलिसांवर आमचा विश्वास नव्हता, म्हणून आम्ही त्यांच्याकडे गेलो नाही. दोन्ही बायकांचा हा गोंधळ ऐकून रियाचे वडील अस्वस्थ झाले आणि आपल्या घरात निघून गेले. दुसरीकडे, रियाच्या वडिलांना त्याच्या बिल्डिंगमध्ये जाताना मीडियाला तोंड द्यावे लागले. दरम्यान, या अहवालांमध्ये इंद्रजित यांना चांगलेच प्रश्न विचारले गेले आणि त्यांची उत्तरे मागितली. यानंतर रियाच्या वडिलांनी मीडियाच्या प्रश्नांवर तीव्र नाराजी व्यक्त केली आणि रागाने ते म्हणाले की, आता जीवे मारणार का…!

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -