टेलिव्हीजन वरिल सर्वाधिक लोकप्रिय रियालिटी शो सारेगमापा (सा रे ग मा)चा ग्रँन्ड फिनाले एपिसाोड रविवारी रात्री पार पडला. आणि या सर्वाधिक चर्चेत असणाऱ्या शोमध्ये नीलांजना रे हीने बाजी मारली आहे. निलांजना रे या शोची विजेती ठरलीये. सर्वाधिक मताने विजयी होत निलांजनाने सारेगमापाची ट्रॉफी पटकावलीये. या ग्रँण्ड फिनाले एपिसोडला बॉलिवूडचे प्रसिद्ध गायक उदित नारायण आणि शिल्पा राव यांनी हजेरी लावली होती. या दोघांच्याही उपस्थितीमुळे शो अधिकच रंजक झाला होता.
शोच्या रनरअपबद्दल सांगायचे झाल्यास फर्स्ट रनरअप राजश्री बाग आणि दुसरी रनरअप होती शरद शर्मा. निलांजना रे हीला ट्रॉफीसह रोख रक्कम 10 लाख रुपयेही मिळालेत. तसेच प्रथम उपविजेत्या स्पर्धकाला म्हणजेच राजश्री बागेला पाच लाख तर द्वितीय उपविजेत्या शरद शर्माला तीन लाख रुपये मिळाले आहेत. ग्रँण्ड फिनालेमध्ये 6 स्पर्धकांमध्ये लढत सुरू होती. सहभागीमध्ये निलांजना रे, राजश्री बाग, शरद शर्मा, अनन्य चक्रर्वती , स्निग्धजित आणि संजना भट्ट यांनी अंतिम फेरी गाठली. ग्रँण्ड फिनालेमध्ये एकापेक्षा एक फरफॉर्मन्स स्पर्धकांनी सादर केले
View this post on Instagram
‘सा रे ग म पा’ची विनर निलांजनाने ट्रॉफी पटकावल्यानंतर माध्यमांशी संवाद साधला यावेळी ती म्हणाली , ‘सारेगमपा’चं विजेतेपद पटकावून मला अत्याधिक आनंद होतोय. शोच्या परिक्षकांकडून खूप शिकण्यासारखं आहे. आमचे मार्गदर्शक आणि ज्युरी सदस्यांनी मला खूप पाठिंबा दर्शवला. मी आता शोवेळी होणाऱ्या मस्ती-मज्जा तसेच सराव, प्रशिक्षणाचा वेळ खूपच मिस करेल. सेटवरील आता प्रत्येकजण माझे कुटुंब झाले आहेत.
कार्यक्रमाच्या सुरूवातीपासूनच निलांजना प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली होती. तिने अनेक वेळा एकापेक्षा एक जबरदस्त परफॉर्मन्स देत प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. शोचे परिक्षक विशाल ददलानी आणि हिमेश रेशमिया यांनीही निलांजनाचं अनेकदा कौतुक केलंय.
हे हि वाचा – वाढदिवशी आशीर्वाद घेण्यासाठी Janhavi Kapoor पोहोचली तिरुपतीला, पाहा फोटो