घरमनोरंजनसलमान खानला दुखापत; 'भारत'च्या सेटवरून घरी परतला

सलमान खानला दुखापत; ‘भारत’च्या सेटवरून घरी परतला

Subscribe

सलमान खानला 'भारत'च्या सेटवर दुखापत झाली असून ही दुखापत जिममध्ये एक्सरसाईज करताना झाली आहे. त्यामुळे तो मुंबईला परतला आहे.

बॉलिवूडचा दबंग खान सलमानचा आगामी चित्रपट ‘भारत’ची बऱ्याच काळापासून चर्चा सुरू आहे. माल्टा आणि अबूधाबीमधील या चित्रपटाचे चित्रीकरण पूर्ण झाले असून सध्या पंजाबमध्ये त्याचे चित्रीकरण सुरू आहे. मात्र या चित्रपटाच्या सेटवर सलमानला दुखापत झाली आणि तो मुंबईत परतला आहे. सलमान खानला ‘भारत’च्या सेटवर दुखापत झाली असून ही दुखापत जिममध्ये एक्सरसाईज करताना झाली आहे. त्याची दुखापत फार मोठी नसून त्याला आरामाची गरज असल्याने मुंबईला परतला आहे. त्याचे पंजाब येथील चित्रीकरण अजून पूर्ण झाले नाही. मात्र, लवकरच तो पुन्हा चित्रीकरण सुरू करणार आहे. सध्या कतरिना कैफ आणि सुनील ग्रोवर यांचे पंजाब येथे शूटिंग सुरू असल्याची माहिती सूत्रांकडून सांगण्यात आले आहे.सलमान खानला ‘भारत’च्या सेटवर दुखापत झाली नसून ही दुखापत जिममध्ये एक्सरसाईज करताना झाली आहे.

वाचा : सलमान खानच्या ‘भारत’साठी नव्या वाघा बॉर्डरची निर्मिती

- Advertisement -

पाकिस्तानी झेंड्यामुळे चित्रपट वादात 

‘भारत’ चित्रपट दिग्दर्शन अली अब्बास करत असून नुकताच हा चित्रपट पाकिस्तानचा झेंडा फडकवल्यामुळे वादाच्या भोवऱ्यात अडकला होता. या चित्रपटाच्या एका सीनसाठी सलमान आणि कतरिनाला वाघा बॉर्डरवर चित्रीकरण करायचे होते. मात्र वाघा बॉर्डरवर याची परवानगी नसल्याने पंजाब येथे वाघा बॉर्डरचा सेट उभारण्यात आला. या दरम्यान भारत आणि पाकिस्तानचा झेंडाही उभारला गेला. यामुळे पंजाब येथील नागरिकांनी याचा कडाडून विरोध केला. त्यांनी याविरोधात पोलिसात तक्रारही दाखल केली होती.

वाचा : सलमान खानच्या ‘भारत’च्या पोस्टरचा फर्स्ट लुक

- Advertisement -

दिग्दर्शकासोबतचा तिसरा चित्रपट 

अली अब्बास जफरचा ‘भारत’ हा सलमानसोबतचा तिसरा चित्रपट आहे. यापूर्वी त्यांचे ‘सुलतान’ आणि ‘टायगर जिंदा है’ हे चित्रपट बॉक्स ऑफिसवर सुपरहिट ठरले आहेत. ‘भारत’ या चित्रपटात तब्बू आणि दिशा पटानी यांच्याही भूमिका पाहायला मिळणार आहेत. हा चित्रपट पुढच्या वर्षी ५ जूनला प्रदर्शित होणार आहे.

वाचा : सलमानच्या ‘भारत’ मध्ये वरूण धवन करणार कॅमियो!

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -