घरमनोरंजन'दगडी चाळ २' सिनेमाला सलमान खानच्या विशेष शुभेच्छा

‘दगडी चाळ २’ सिनेमाला सलमान खानच्या विशेष शुभेच्छा

Subscribe

या बहुचर्चित चित्रपटाला बॉलिवूडचा दबंग खान म्हणजेच सलमान खानने सुद्धा शुभेच्छा दिल्या आहेत. सोशल मीडियावर सध्या याचीच चर्चा आहे.

दगडी चाळ म्हटलं(dagdi chawal) की डॅडी आणि सूर्या(dady – durya) ही दोन नावं लगेचच समोर येतात. आणि त्याच बरोबर एक वेगळाच इतिहास सुद्धा समोर येतो. डॅडी आणि सूर्या यांचा संपूर्ण इतिहास सांगणारा ‘दगडी चाळ’ चित्रपट काही वर्षांपूर्वी प्रदर्शित झाला होता. आता याच चित्रपटाचा दुसरा भाग लवकरच प्रदर्शित होणार आहे. अभिनेता मकरंद देशपांडे(makrand deshpande) डॅडींच्या भूमिकेत तर अभिनेता अंकुश चौधरी(ankush choudhari) सूर्याच्या भूमिकेत दिसणार आहे. या बहुचर्चित चित्रपटाला बॉलिवूडचा दबंग खान म्हणजेच सलमान खानने सुद्धा शुभेच्छा दिल्या आहेत. सोशल मीडियावर सध्या याचीच चर्चा आहे.

हे ही वाचा – सूर्या म्हणतोय ‘आय हेट यू डॅडी’ ‘दगडी चाळ २’ मध्ये नेमकं काय घडलं ?

- Advertisement -

‘मंगलमूर्ती फिल्म्स’ आणि संगीता अहिर निर्मित, चंद्रकांत कणसे दिग्दर्शित ‘दगडी चाळ २’ ची सध्या जोरदार चर्चा आहे. ‘दगडी चाळ’ मध्ये ‘डॅडीं’चा विश्वासू सूर्या ‘दगडी चाळ २’मध्ये अचानक तिरस्कार करू लागला आहे, याचे कारण जाणून घेण्याची उत्सुकता सर्वच प्रेक्षकांना लागली आहे. त्यातच नुकतेच या चित्रपटातील ‘राघू पिंजऱ्यात आला’ हे एक जबरदस्त गाणे प्रेक्षकांच्या भेटीला आले आहे या गाण्याची खासियत म्हणजे या गाण्यातून बॉलिवूड अभिनेत्री डेझी शाह हिने मराठी सिनेसृष्टीत पदार्पण केले आहे. त्यामुळे या चित्रपटाची एकंदरच सर्वत्र हवा आहे. आता तर या चित्रपटाच्या संपूर्ण टीमला बॉलिवूडचा दबंग अभिनेता सलमान खान यानेही सोशल मीडियावरून शुभेच्छा दिल्या आहेत. १८ ऑगस्ट रोजी ‘दगडी चाळ २’ हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. माझ्याकडून ‘दगडी चाळ २’ चित्रपटाला खूपच शुभेच्छा असं सलमान खान(salman khan) त्याच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून दिल्या आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by Salman Khan (@beingsalmankhan)

- Advertisement -

हे ही वाचा – अंकुश चौधरी विचारतोय ‘सुखं म्हणजे नक्की काय असतं’?

डॅडी आणि सूर्याचे नाते आपण ‘दगडी चाळ’ मध्ये यापूर्वीच पाहिले आहे. डोकॅलिटीचा वापर करून सूर्या अल्पावधीतच डॅडींचा उजवा हात बनला. मात्र ‘दगडी चाळ २’ मध्ये असे काय घडले की, सूर्या डॅडींचा इतका रागराग करतोय. या सगळ्यामागचे नेमके काय कारण आहे हे प्रेक्षकांना चित्रपट गृहात पाहायला मिळणार आहे.

हे ही वाचा – ‘भारत रंग महोत्सव, केंद्र सरकारच्या सांस्कृतिक मंत्रालयाचा उपक्रम

nidhi pednekar
nidhi pednekarhttps://www.mymahanagar.com/author/nidhipednekar/
मागील ४ वर्षांपासून आकाशवाणीवर मुंबई येथे कंटेन्ट रायटर आणि अँकर म्हणून काम करण्याचा अनुभव, पॉलिटिकल पि.आर. मॅनेजमेंट क्षेत्रात काम करण्याचा अनुभव त्याचसोबत ललित, मनोरंजन, राजकीय घडामोडी, लाईफस्टाईल या विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -