घरमनोरंजन'या' कारणास्तव अजयच्या सिनेमातून शरमन जोशीचा पत्ता कट झाला होता?

‘या’ कारणास्तव अजयच्या सिनेमातून शरमन जोशीचा पत्ता कट झाला होता?

Subscribe

बॉलिवूड अभिनेता शरमन जोशी २८ एप्रिलला आपला ४४ वा वाढदिवस साजरा करणार आहे. आपल्या दमदार भुमिकेच्या जोरावर शरमन जोशीने चाहत्यांच्या मनावर आपली छाप पाडली आहे. बिग स्क्रिनवर शरमनने काही अशा ही भुमिका केल्या आहेत ज्या कधीच कोणीही विसरु शकत नाही. ३-इडियट्सचेच उदाहरण घ्या ना. त्यामधील राजू रस्तोगीचे कॅरेक्टर असेल किंवा गोलमाल मधील लक्ष्मणचे… त्याच्या प्रत्येक भुमिकेने त्याने प्रेक्षकांनी कधी हसवेलय तर कधी इमोशनल ही केलेयं. परंतु फार कमी लोकांनी नोटीस केले असेल की, अखेर शरमन जोशी हा गोलमाल सिनेमाच्या पुढील सिक्वल्समध्ये का दिसला नाही? खरंतर यावर शर्मनने स्वत: उत्तर दिले होते.

रोहित शेट्टी याचा सिनेमा गोलमालने बॉक्स ऑफिसवर तगडी कमाई केली होती. सिनेमाने कमाईचे रेकॉर्ड ब्रेक ही केले होते. पण जेव्हा गोलमालचे पुढील सिक्वल्स आले तेव्हा मात्र शरमन त्यात झळकला नाही. फॅन्सना नेहमीच प्रश्न पडायचा की, त्याला पुढील सिक्वल्समध्ये का घेतले गेले नाही?

- Advertisement -

काही मीडिया रिपोर्ट्सनुसार, शरमनचा या फ्रेंचाइजीमधून पत्ता कट करण्यामागील कारण असे होते की, त्याने फी खुप वाढवली आहे. परंतु शर्ममने यावर अखेर स्पष्टीकरण दिलेच.

- Advertisement -

एका मुलाखती दरम्यान, शरमन जोशी याने याबद्दलचा खुलासा केला होता. त्याने असे म्हटले होते की, मला असे वाटते माझ्या मॅनेजर आणि प्रोड्युसरमध्ये काही प्रॉब्लेम्स झाले होते. याच कारणास्तव मी सिनेमात नाही. पण असो मला जर पुन्हा त्या सिनेमात काम करण्यासाठी विचारले तर मी जरुर करेन. शरमन जोशीच्या अशा बोलण्यावरुन स्पष्ट झाले होते की, गोलमालचे प्रोड्युसर आणि त्याच्यामध्ये फी वरुन काहीतरी वाद झाला होता.


हेही वाचा- ‘आदिपुरुष’च्या प्रमोशनला सैफ अली खान राहणार अनुपस्थित; ‘या’ कारणामुळे घेतला निर्णय

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -