साउथ स्टार धनुष (Dhanush ) आणि त्याची पत्नी ऐश्वर्या रजनीकांत (Aishwaryaa Rajinikanth) यांनी वेगळं होण्याचा निर्णय घेतला. 18 वर्षांच्या संसारानंतर त्यांनी लग्न मोडण्याचा निर्णय घेतला. या निर्णयानंतर त्यांच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला. धनुष आणि ऐश्वर्या यांना यत्र आणि लिंगा अशी दोन मुले आहेत. घरात वयस्कर माणसे देखील आहेत. त्यांच्या घटस्फोटाचा निर्णय हा त्यांच्या चाहत्यांपेक्षा कुटुंबासाठी धक्कादायक होता. दोघांच्या घटस्फोटोचा सर्वांत जास्त परिणाम हा सुपरस्टार रजनीकांत (Rajinikanth) यांच्यावर झाला असून मुलगी आणि जावई आता वेगळे होणार हे ऐकून ते पूर्णपणे कोलमडून गेले आहेत.
मीडिया रिपोर्टनुसार, रजनीकांत यांना मुलीचे लग्न तुटल्याने फार दुख: झाले आहे. दोघांचे वेगळे होणे केवळ तात्पुरते आहे. काही दिवसात पुन्हा एकत्र येतील असा त्यांना विश्वास आहे. रजनीकांत लेक ऐश्वर्याला घटस्फोटाचा निर्णय बदलण्यासाठी विनवणी करत असून दोघांचे लग्न वाचवण्यासाठी ते प्रयत्न करत आहेत. धनुष आणि ऐश्वर्या यांच्यात पहिल्यापासून भांडणे होती मात्र अनेकदा रजनीकांत यांनी मध्यस्थी करुन त्यांची भांडणे सोडवण्यात यशस्वी झाले आहे. त्यामुळे यावेळी देखील ते दोघांचे लग्न वाचवण्यात सफल होतील असा त्यांना विश्वास आहे.
तर दुसरीकडे धनुषचे वडील कस्तूरी राजा यांनी ही दोघांचा घटस्फोट होणार नाही असे म्हटले आहे. दोघांमध्ये काही मतभेद आहेत म्हणून त्यांची भांडणे झालीत. पती पत्नीत भांडणे होत असतात. आम्ही ऐश्वर्या आणि धनुषला समजावण्याचा प्रयत्न करत आहोत असे त्यांनी म्हटले.
OM NAMASHIVAAYA 🙏🙏🙏 pic.twitter.com/XXFo8BDRIO
— Dhanush (@dhanushkraja) March 23, 2021
17 जानेवारीला धनुष आणि ऐश्वर्याने सोशल मीडियावर स्टेटमेंट जारी करत त्यांचा 18 वर्षांचा संसार मोडत असल्याचे जाहीर केले. आम्ही पती पत्नी म्हणून वेगळे होत असून व्यक्तीगत पातळीवर स्वत:ला समजून घेण्यासाठी आम्ही हा निर्णय घेतला आहे. आमच्या निर्णयाचा आदर करावा आणि या गोष्टीचा सामना करण्यासाठी आम्हाला प्रायव्हसी द्या,असे आवाहन केले होते.
हेही वाचा – Dhanush Aishwarya Seprated : धनुष ऐश्वर्याचा घटस्फोट, विभक्त होण्याचा ट्विटरवर केला खुलासा