अभिनेता ऋषभ शेट्टीचा कन्नड चित्रपट ‘कांतारा’ सध्या बॉक्स ऑफिसवर कल्ला करत आहे. या चित्रपटाने करोडोंची कमाई केली असून या चित्रपटाला प्रेक्षक भरघोस प्रतिसाद देऊ लागले आहेत. शिवाय हिंदी आणि इतर भाषेमध्ये देखील हा चित्रपट पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक असलेले दिसून येत आहेत. कन्नडनंतर हिंदी आणि तेलुगूमध्ये प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने पाच दिवसांच्या आत बॉक्स ऑफिसवर तूफान कमाई करत आहे. दरम्यान, बॉलिवूड अभिनेत्री कंगना रनौतने सुद्धा ऋषभ शेट्टीच्या ‘कांतारा’ चित्रपटाचे कौतुक केले आहे.
‘कांतारा’ चित्रपट पाहिल्यानंतर कंगनाने तिच्या इंस्टाग्रामवरुन लाईव्ह केलं. ज्यामध्ये तिने ऋषभ शेट्टीच्या चित्रपटाचे कौतुक केले. तसेच ती म्हणाली की, “मी आत्ताच माझ्या कुटुंबासोबत ‘कांतारा’ चित्रपट पाहून आले आहे आणि आता सुद्धा माझ्या अंगावर शहारे आले आहेत. किती उत्तम चित्रपट होता. ऋषभ शेट्टी, तुम्हाला सलाम, लेखन, दिग्दर्शन, अभिनय, अॅक्शन सर्व उत्तम आणि अविश्वसनीय! परंपरा, लोक कथा, स्वदेशी मुद्द्यांचं उत्तम मिश्रण आहे. सुंदर फोटोग्राफी, अॅक्शन, हाचं खरा चित्रपट आहे.”
कंगना रनौतने सांगितलं की, “मी चित्रपटगृहात देखील असे अनेक लोक पाहिले आहेत. जे म्हणत होते की, त्यांनी असा अनुभव कधीही पाहिला नाही. येणाऱ्या एका आठवड्यापर्यंत मी या चित्रपटाच्या अनुभवातून बाहेर येऊ शकत नाही. या चित्रपटासाठी धन्यवाद.”
काय आहे ‘कांतारा’ची कथा?
‘कांतारा’ चित्रपटाची कथा ऋषभ शेट्टीने लिहिली असून चित्रपटात मुख्य भूमिका देखील त्यांनीच साकारली आहे. या चित्रपटाची कथा रहस्यमय आणि चित्तथरारक आहे. यामध्ये 1870 मधील काळ दाखवण्यात आला आहे.
हेही वाचा :