काही दिवसांपूर्वीच शाहरूख खानची निर्मीती असलेली बेताल ही वेब सीरीजचा ट्रेलर ओटीटी प्लॅटफॉर्मवर शेअर करण्यात आला होता. पण आता ही वेबसिरीज वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. मराठी लेखक समीर वाडेकर आणि मेहश गोसावी यांनी बेताल सीरिजची कथा चोरल्याचा आरोप शाहरुखवर केला आहे. त्यांच्या ‘वेताळ’ सिनेमातून शाहरूखने कथा चोरल्याचा आरोप त्यांनी केला.
You can run, but you can't hide.
Watch @ItsViineetKumar as Sirohi in #Betaal, premiering 24th May, only on @NetflixIndia. pic.twitter.com/jlbVEldINn— Red Chillies Entertainment (@RedChilliesEnt) May 20, 2020
‘वर्षभरापूर्वीच लेखकांनी त्यांच्या वेताळची स्क्रीप्ट रजिस्टर केली होती आणि त्याच्या काही महिन्यांनंतर जुलै २०१९ मध्ये ‘बेताल’ सीरिजचं चित्रीकरण सुरू झालं. या सिनेमाची कथा घेऊन ते अनेक निर्मात्यांकडे गेले होते. यात रेड चिलीज एण्टरटेनमेन्टसोबत कोणतीही चर्चा झाली नव्हती. सध्या उच्च न्यायालयात हा वाद गेला आहे.’
लेखकांच्या मते, कथा आणि संकल्पनेसोबतच स्क्रिप्टमधील अनेक सीन चोरी केले आहेत. वाडेकर आणि गोसावी यांनी सीरिजवर स्थगिती आणण्याची याचिका दाखल केली होती. मात्र न्यायलयाने ही याचिका फेटाळली. पण जर त्यांच्या आरोपात तथ्य असेल तर नंतर ते भरपाईची मागणी करू शकतात. दरम्यान, शाहरूख खानच्या कंपनीकडून यासंबंधी कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही.
हे ही वाचा – बिग बींनी दिल्या ‘रमजान ईद’ च्या शुभेच्छा, चाहते म्हणाले…