कलाकार त्यांच्या चित्रपटांसोबतच, खासगी आयुष्य, प्रेम संबंधांबाबत विचारलेल्या प्रश्नांवर नेहमी विचार करून थोडक्यात सांगतात. मात्र करण जौहर नेहमीच या कलाकारांच्या मनातील गोष्टी अगदी सहज वदवून घेतो. येत्या काही दिवसात अभिनेता विजय देवरकोंडा आणि अभिनेत्री अनन्या पांडे ‘कॉफी विद करण ७’ मध्ये दिसणार आहेत.
‘कॉफी विथ करण ७’ मध्ये करणने विजय देवरकोंडाला विचारलं की, तू रिलेशनमध्ये आहेस का? मात्र विजय याबाबत काहीही न सांगता म्हणाला की, “ज्या दिवशी मी लग्न करेन आणि माझी मुलं असतील, त्या दिवशी मी सगळ्यांशी याबाबत बोलेण, तोपर्यंत मी कोणालाही दुखवू शकत नाही, जे माझ्यावर प्रेम करतात. असे खूप लोक आहेत जे अभिनेता म्हणून माझ्यावर प्रेम करतात. त्यामुळे मी त्यांच मन दुखवू शकत नाही.”
View this post on Instagram
करण जौहरच्या या शोमध्ये सर्वात आधी आलिया भट्ट आणि रणवीर सिंह आले होते. त्यानंतर अक्षय कुमार आणि समंथा रूथ प्रभूने हजेरी लावली होतीय. तिसऱ्या एपिसोडमध्ये सारा अली खान आणि जान्हवी कपूर यांनी हजेरी लावली होती.दरम्यान, विजय देवरकोंडा लायगर या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करत आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन पुरी जगंनाध यांनी केले आहे.