घरमनोरंजनअनुष्कासोबत लग्न केल्यानं माझं आयुष्यच बदललं - विराट

अनुष्कासोबत लग्न केल्यानं माझं आयुष्यच बदललं – विराट

Subscribe

बॉलीवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा आणि भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली यांच्या लग्नाला एक वर्ष पूर्ण झालं आहे. अनुष्कामुळे आपल्या आयुष्कात खुप चांगला बदल झाल्याची कबूली या निमित्ताने विराटने दिली आहे.

बॉलीवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा आणि भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली यांच्या लग्नाला आज, ११ डिसेंबर रोजी एक वर्ष पूर्ण झालं आहे. गेल्यावर्षी याचदिवशी इटलीमध्ये दोघेही विवाहबंधनाट अडकले होते. या वर्षात अनुष्कामुळे आपल्या आयुष्कात खुप चांगला बदल झाल्याची कबूली या निमित्ताने विराटने दिली आहे. सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल करत त्याने आपल्या वैवाहिक जीवनावर भाष्य केले आहे. विराट म्हणतो की, ‘जेव्हापासून अनुष्काला भेटलोय, तेव्हापासून माझ्या जीवनात सकारात्मक बदल झाले आहेत. याआधी मी इतका प्रॅक्टीकल नव्हतो. अनुष्काकडून मी खूप काही शिकलो आहे.’


अनुष्का आणि विराट यांनी त्यांच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. या निमित्ताने त्यांनी लग्नाचा पहिल्या वाढदिवसाचा आनंद चाहत्यांसोबत शेअर केला आहे.

 

View this post on Instagram

 

It’s heaven, when you don’t sense time passing by … It’s heaven, when you marry a good ‘man’ … ?

A post shared by AnushkaSharma1588 (@anushkasharma) on

- Advertisement -

भेटल्यावर एकत्र राहतो

आम्ही दोघे आमच्या कामात व्यस्त असतो. जेव्हा मोकळा वेळ मिळतो तेव्हा सोबत घालवतो. मुंबईत राहत असल्याने एकमेकांसोबत वेळ घालवणं शक्य होतं. आम्ही दोघे वेळ कसा घालवतो, असा विचार लोकं करतात. पण खर सांगायच तर आम्ही सुद्धा सामान्य माणसांसारखचं वेळ घालवतो. भेटल्यावर एकत्र राहतो, असंही विराट यांनी या व्हिडिओमध्ये सांगितलं आहे. दरम्यान, भारत संघ सध्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर आहे. आपल्या बिजी शेड्यूल मधून वेळ काढून अनुष्का शर्मा ऑस्ट्रेलियाला गेली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -