बॉलिवूड चित्रपट निर्माते आणि ‘द काश्मीर फाइल्स’ चित्रपटाचे दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांना गृह मंत्रालयाने ‘वाय’ कॅटेगरीची सिक्युरिटी दिली आहे. इंटेलिजन्स ब्युरोच्या थ्रेट पर्सेप्शन रिपोर्टच्या आधारे गृह मंत्रालयाने विवेक यांना ही सुरक्षा दिली आहे. याचा अर्थ विवेक अग्निहोत्री भारतभर जिथे जिथे जातील त्यावेळी त्याच्यासोबत सीआरपीएफचे जवान उपस्थित असतील. चित्रपटामुळे येत असलेल्या धमक्यांमुळे ही सुरक्षा देण्यात आल्याचे म्हटले जातेय.
1990 च्या दशकात काश्मिरी पंडितांच्या नरसंहारावर आधारित ‘द काश्मीर फाईल’ हा चित्रपट आहे. विवेक अग्निहोत्री यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. बॉक्स ऑफिसवर ‘द काश्मीर फाइल्स’ने दबदबा निर्माण केला आहे. या चित्रपटाने 6 दिवसात जवळपास 80 कोटींची कमाई केली आहे. अनेक राज्यांमध्ये हा चित्रपट करमुक्तही करण्यात आला आहे. एवढेच नाही तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही या चित्रपटाचे कौतुक केले आहे. या चित्रपटावरून सुरू असलेल्या वादावर अनेक बॉलिवूड कलाकारांनीही आपलं मत मांडलं आहे. मात्र दुसरीकडे चित्रपटांच्या कलाकारांना आणि दिग्दर्शकांना धमक्या येत आहेत.
Film director Vivek Agnihotri has been given ‘Y’ category security with CRPF cover pan India: Government Sources
(File photo) pic.twitter.com/63l1B0BlMz
— ANI (@ANI) March 18, 2022
Y श्रेणी सुरक्षा म्हणजे काय?
Y श्रेणीच्या सुरक्षेमध्ये व्यक्तीच्या सुरक्षेसाठी एकूण 8 सुरक्षा कर्मचारी तैनात आहेत. यामध्ये ज्या व्हीआयपीला सुरक्षा दिली जाते, त्याच्या घरी पाच सशस्त्र स्टॅटिक गार्ड तैनात केले जातात. तसेच, तीन शिफ्टमध्ये तीन पीएसओ सुरक्षा दिली जाते.
काश्मिरी पंडितांवर होणारे अत्याचार आणि त्यांची खोऱ्यातून झालेली पलायनाची कहाणी या चित्रपटात दाखवली आहे. चित्रपटातील काश्मिरी पंडितांची कथा पाहून प्रेक्षक भावूक झाले आहेत. या चित्रपटावरून राजकारणही तापले आहे. राजकारणी भाषणबाजी करत आहेत, तर अनेकजण या चित्रपटाला विरोधही करत आहेत. अशा स्थितीत विवेक अग्निहोत्री आणि चित्रपटातील स्टार्समध्ये खूप ट्रोल केले जात आहे.
नाना पाटेकरांनी व्यक्त केले मत
अभिनेते नाना पाटेकर यांनी ‘द काश्मीर फाइल्स’ वादावर मत व्यक्त केले आहे. नाना पाटेकर म्हणाले की, अनावश्यक गोंधळ घालणे चुकीचे आहे. भारतातील हिंदू आणि मुस्लिमांना एकमेकांची गरज आहे. प्रत्येकाने शांततेत आणि एकतेने जगणे आवश्यक आहे. अशा परिस्थितीत एखाद्या चित्रपटामुळे एवढा मोठा वाद निर्माण होणे योग्य नाही. चित्रपटामुळे समाजाचे दोन तुकडे होतात, अशा समाजात दरारा निर्माण करणे योग्य नाही.