घरमनोरंजनलता दीदींनी लग्न का नाही केले..? 'नाम रह जायेगा'च्या येत्या भागात होणार...

लता दीदींनी लग्न का नाही केले..? ‘नाम रह जायेगा’च्या येत्या भागात होणार खुलासा

Subscribe

दिवंगत लता मंगेशकर, आजही त्यांच्या चाहत्यांमध्ये नाईटिंगेल ऑफ इंडिया म्हणून ओळखल्या जातात, त्यांनी ‘भारताचा आवाज’ म्हणून आपले स्थान निर्माण केले आहे. त्यांच्या आवाजाला प्रत्येक भारतीयाच्या हृदयात एक विशेष स्थान आहे आणि प्रत्येकाच्या मनात अमिट छाप सोडली आहे, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. स्टारप्लसने या लोकप्रिय आवाजांना त्यांच्या ‘नाम रह जायेगा’ या खास मालिकेद्वारे संगीत उद्योगातील दिग्गज लता मंगेशकर यांच्या सन्मानार्थ एकत्र आले आहेत. भावना आणि नॉस्टॅल्जियाने भरलेल्या, या विशेष कार्यक्रमात, गायक त्यांच्या आठवणी आणि लताजींशी संबंधित किस्से शेअर करत असतात.

‘नाम रह जायेगा’च्या येत्या भागामध्ये प्रेक्षकांना लता मंगेशकरांचे काही न पाहिलेले फोटो आणि आयुष्यातील काही खास किस्से शेअर केले जातील. या भागात लता मंगेशकरांनी कधीही लग्न का केले नव्हते या गोष्टीचा खुलासा देखील केला जाईल. या भव्य श्रद्धांजली कार्यक्रमात सोनू निगम, अरिजित सिंग, शंकर महादेवन, नितीन मुकेश, नीती मोहन, अलका याज्ञिक, साधना सरगम, प्यारेलाल जी, उदित नारायण, शान, कुमार सानू, अमित कुमार, जतिन पंडित, जावेद अली, ऐश्वर्या मजुमदार, स्नेहा पंत, पलक मुच्छल आणि अन्वेषा मंचावर एकत्र येत लता मंगेशकर यांची सर्वात प्रतिष्ठित गाणी गाऊन त्यांना श्रद्धांजली वाहतील.

- Advertisement -

साईबाबा स्टुडिओचे श्री गजेंद्र सिंग निर्मित, ‘नाम रह जायेगा’ त्या परम आवाजाला श्रद्धांजली वाहत आहे. ही 8 भागांची मालिका 1 मे 2022 पासून सुरू झाली असून येत्या रविवारी त्याचा तिसरा भाग स्टार प्लसवर प्रदर्शित होणार आहे.

 


हेही वाचा :‘द हिंदू बॉय’ चित्रपटातून पुन्हा एकदा पहायला मिळणार काश्मिरी पंडितांच्या व्यथा

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -