विवेक अग्निहोत्री दिग्दर्शित द काश्मीर फाईल्स सिनेमाची सध्या देशभरात जोरदार चर्चा सुरु आहे. पल्लवी जोशी, अनुपम खेर आणि चिन्मय मांडलेकर यांच्या मुख्य भूमिका असलेल्या या चित्रपटाने प्रेक्षकांचे विशेष लक्ष वेधले आहे. काश्मीर पंडितांच्या नरसंहारावर आधारित हा चित्रपट प्रेक्षकांसह अनेक चित्रपट समीक्षकांच्या मनात स्थान निर्माण करत आहे. या चित्रपटाच्या टीमने नुकतीच देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली, याचे फोटो चित्रपटाच्या स्टार्सनी आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर शेअर केले आहेत. यानंतर नेटकऱ्यांकडूनही या चित्रपटाचे कौतक होतेय. तर अनेकांनी ट्रोलही केले, आता बॉलिवूडच्या अनेक सेलिब्रेटींनी द काश्मीर फाई्ल्स चित्रपट पाहण्याचे आवाहन करत आहे. यात आघाडीची अभिनेत्री यामी गौतम हीने देखील चाहत्यांना द काश्मीर फाईल्स पाहण्याचे आवाहन केले आहे. तर यामी गौतमीचा पती आदित्य धर यानेही चित्रपटावर प्रतिक्रिया दिली आहे.
यामीने काश्मीर फाईल्स पाहिल्यानंतर एक स्पेशल पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली आहे. यात तिने प्रेक्षकांना चित्रपट पाहण्याचे आवाहन केले आहे. यामीनं सांगितलं की, देशातील कित्येकांना काश्मिरमध्ये काय झाले याविषयी माहिती नाही. कश्मिर पंडितांची झालेली हत्या आणि त्यांचं विस्थापन हा चर्चेचा विषय आहे. मात्र त्याला फारसं महत्व देण्यात आलेले नाही. यामीने लिहिले आहे की, एका काश्मिरी पंडिताची पत्नी असल्याने मला या शांतता प्रिय समुदायावर होणाऱ्या अत्याचारांची आधीच कल्पना होती. परंतु देशातील बहुतांश लोकांना अजूनही या सत्याची जाणीव नाही, सत्य जाणून घेण्यासाठी आम्हाला 32 वर्षे लागली आहेत. ३२ वर्षांनंतर त्या सत्यावर आणखी एक चित्रपट बनला आहे. आपण सर्वांनी सत्य काय ते जाणून घेण्यासाठी हा चित्रपट पाहिला पाहिजे. असं आवाहन यामीनं यावेळी केलं आहे.
Being married to a Kashmiri Pandit, I know first hand of the atrocities that this peace-loving community has gone through. But majority of the nation is still unaware. It took us 32 years and a film to get to know the truth. Please watch and support #TheKashmirFiles . 🙏 https://t.co/rjHmKVmiXZ
— Yami Gautam Dhar (@yamigautam) March 14, 2022
द काश्मीर फाईल्स पाहून यामीचा पती झाला भावूक
यामीसोबत तिचा पती आदित्य धरनेही हा चित्रपट पाहिला आणि तो खूप भावूक झाला. द काश्मीर फाईल्स पाहिल्यानंतर आता आदित्यनेही सोशल मीडियावर प्रतिक्रिया दिली आहे. या पोस्टमधून त्यांने आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. ने आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, तुम्ही आतापर्यंत काश्मिरी पंडितांच्या घरांचे अनेक व्हिडिओ पाहिल्या असतील, परंतु या चित्रपटात दाखवलेल्या भावना खऱ्या आहेत. एक समाज म्हणून आपण किती काळ आपल्या वेदना आणि शोकांतिका मागे ठेवल्या हे यातून दिसून आले.
You might have seen numerous videos of Kashmiri Pandits breaking down in the theatres after watching #TheKashmirFiles. The emotion is real. It shows how long we kept our pain and tragedy repressed as a community. We didn’t have any shoulder to cry on and no ear to hear our pleas. pic.twitter.com/cAXZpSzDnK
— Aditya Dhar (@AdityaDharFilms) March 14, 2022
यामी गौतमचा पती आदित्य धर हा काश्मिरी पंडित आहे. तो बॉलीवूडमधील लेखक आणि चित्रपट दिग्दर्शक देखील आहे. यामी आणि आदित्यचे गेल्या वर्षी जूनमध्ये लग्न झाले होते. उरी द सर्जिकल स्ट्राईक हा चित्रपट आदित्य धरने दिग्दर्शित केला होता आणि तिथून दोघांमधील अफेअरलाही सुरुवात झाली. बराच काळ एकमेकांना डेट केल्यानंतर दोघांनी जून 2021 मध्ये लग्न केले.