घरफिचर्सतिबेटच्या पोपटात चीनचा प्राण

तिबेटच्या पोपटात चीनचा प्राण

Subscribe

सुईच्या अग्रावर राहील एवढीही जमीन दुर्योधनाने नाकारली तेव्हा महाभारत घडले. ते नाकारणारा दुर्योधन अन्यायी आणि त्याचा सामना करणारे पांडव नीतीमान ठरले. तेव्हा शस्त्र उगारणे हा अंतिम पर्याय असतो, असावा ही आपली केवळ नीतीमत्ता वा धर्म नाही तर रोजच्या जगण्यातली श्रद्धा आहे. कोणत्याही प्रश्नाकडे बघताना आपण आपल्याच श्रद्धेमधून बघत असतो आणि आपला प्रतिसाद आणि त्याच्या परिसीमा ही श्रद्धाच आखून देते. भारतीय लोक इथेच तोकडे पडतात.

चीन लडाखमधून माघार घ्यायला काही तयार नाही. अशावेळी तिबेट स्वातंत्र्याचा मुद्दा उपस्थित करून भारत चीनला शह देऊ शकतो का? खरं म्हणजे तिबेटमधील चीनच्या आक्रमणाबद्दल जागतिक स्तरावर असंतोष आहे. पण बोलणार कोण, हा प्रश्न आहे. भारताने त्यादृष्टीने पाऊल उचलले तर चीनच्याविरोधात अनेक राष्ट्रे उभी राहू शकतील. अर्थात भारतालाही त्याची किंमत मोजावी लागेल. पण चीनच्या उद्दामपणाला आपण टक्कर देऊ शकतो हेही त्यानिमित्ताने सिद्ध होईल. चीन हा भारताचा शत्रू असल्याप्रमाणे वर्तणूक करतो आणि भारताशी आर्थिक व्यापार उदीम असूनही त्याचे भारताला खाली खेचण्याचे उद्योग संपलेले नाहीत ही वस्तुस्थिती आहे.

चीनसारख्या बलाढ्य सत्तेसमोर आपण टिकणार का? की चिरडले जाऊ ? भारताला जागतिक व्यवस्थेमध्ये स्वतःचे उज्ज्वल स्थान निर्माण करता येईल का? भारताच्या या प्रयत्नांमध्ये चीन खोडा का घालतो? त्याला वठणीवर आणण्यासाठी आपल्याकडे काहीच मार्ग नाहीत का? लहानशा पाकिस्तानने आपल्याला चार दशके नाडले तिथे चीनसारख्या राक्षसाने भारताशी शकले उडवायची ठरवली तर आपले काय होणार? आर्थिक महासत्ता बनलेल्या चीनसमोर बलाढ्य अमेरिका-रशिया हे देश नांगी का टाकतात. भारताच्या सर्व शेजारी देशांवर पैशाची उधळपट्टी करणारा चीन त्या राष्ट्रांवरील भारताचा प्रभाव नष्ट करण्यात यशस्वी होईल का असे प्रश्न आपल्या मनात घोंघावत असतात. भारतीय राजकीय नेतृत्व हिंदी चिनी भाई भाई म्हणून घोषणा देत होते तेव्हा म्हणजे कोणतेही लष्करी आव्हान भारतातर्फे समोर नसतानाही केवळ ‘भारताला धडा शिकवायचा’ म्हणून १९६२ चे युद्ध चीन छेडले आणि भारताच्या ताब्यातील प्रदेश हिसकावून घेतले आणि आपण चुपचाप मान खाली घालून ही अवहेलना सोसली त्या अपमानाच्या स्मृती समाजमनामधून जात नाहीत.
पूर्वीच्या काळी कोणत्याही राक्षसाला हरवायचे तर मोठे कठिण काम असे. मग त्याचे पंचप्राण कशामध्ये आहेत ते शोधून तो पोपट म्हणा मांजर म्हणा ह्या प्राणापर्यंत पोहोचायचे आणि त्याला पराक्रमाची पराकाष्ठा करत मारायचे अशा गोष्टी आपण वाचत होतो. दुरान्वयाने का होई ना पण चीन या आर्थिक महासत्ता बनायच्या मार्गावर असलेल्या-आसुरी लष्करी ताकद असलेल्या आणि भारताची शकले उडवून त्याला आपल्या पंजामध्ये बंदिस्त करायला उत्सुक असलेल्या चीनशी आपली हजारो किमी सीमा जोडलेली आहे, अशा शेजार्‍याचा मुकाबला करायचा तर त्याचे पंचप्राण कशामध्ये आहेत हे समजून घेतले तर काम सोपे होऊ शकते.

- Advertisement -

दोन राष्ट्रांमधील विवाद मिटवताना युद्ध टाळावे म्हणून साम, दाम, दंड, भेद या मार्गाचा वापर राजाने करावा असे चाणक्याने लिहिले आहे. हे तत्व वा नियम आपल्या डोक्यामध्ये फिट्ट बसला आहे. म्हणून कोणत्याही राज्यकर्त्याने एखाद्या विवादाला सामोरे जाताना या उपायांचा वापर केला नाही तर तो राज्यकर्ता कर्तव्याला चुकला. शिरजोर असल्यामुळे त्याच राजधर्मापासून स्खलन झाले आहे असाच समज सर्वसामान्य भारतीयांचा झालेला आहे. कोणत्याही मार्गाने ऐकलेच नाही आणि समोरची व्यक्ती अन्याय करतच राहिली तर मात्र युद्धाला पर्याय नसतो असे भगवद्गीताच सांगते. किंबहुना असे युद्ध हेच धर्मयुद्ध म्हटले गेले आहे.

सुईच्या अग्रावर राहील एवढीही जमीन दुर्योधनाने नाकारली तेव्हा महाभारत घडले. ते नाकारणारा दुर्योधन अन्यायी आणि त्याचा सामना करणारे पांडव नीतीमान ठरले. तेव्हा शस्त्र उगारणे हा अंतिम पर्याय असतो, असावा ही आपली केवळ नीतीमत्ता वा धर्म नाही तर रोजच्या जगण्यातली श्रद्धा आहे. कोणत्याही प्रश्नाकडे बघताना आपण आपल्याच श्रद्धेमधून बघत असतो आणि आपला प्रतिसाद आणि त्याच्या परिसीमा ही श्रद्धाच आखून देते. भारतीय लोक इथेच तोकडे पडतात.
चीन या विषयाचे तज्ज्ञ, भारताचे तेथील एकेकाळचे राजदूत आणि नंतरच्या काळामध्ये भारताचे परराष्ट्रसचीव व पुढे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार म्हणून काम केलेले श्याम सरण म्हणतात, भारत आणि चीन यांच्यामध्ये गैरसमजाचे वातावरण आहे. त्याचे प्रमुख कारण हेच की आपण चिन्यांची विचारप्रक्रिया समजून घेतलेली नाही. चिनी कसे विचार करतात? आपल्या खेळीला ते प्रतिसाद कसे देतात याचे ज्ञान असल्याशिवाय आणि ते अंमलात आणल्याशिवाय ह्या कामी आपल्याला यश मिळू शकत नाही. जेव्हा स्वतःच्या हिताची बाब असते तेव्हा चिन्यांचा हा आग्रह असतो की त्या हिताशी संबंधित बाबींचे तंतोतंत वर्णन उपलब्ध असावे. पण इतरांच्या हिताच्या बाबतीमध्ये ते जाणीवपूर्वक संदिग्धता ठेवतात आणि विषय न संपवता लोंबकळत ठेवतात.

- Advertisement -

तिबेट हा चीनचा अविभाज्य भाग आहे हे भारताने निर्विवादपणे मान्य करावे आणि तशी जाहीर भूमिका घ्यावी, असा चीनचा आग्रह असतो. पण जम्मू-काश्मीरच्या बाबतीत तो भारताच्या सार्वभौमत्वाविषयी मात्र तशी भूमिका घेण्याचे टाळतो. श्याम सरण पुढे म्हणतात की, बळाचा वापर हे अखेरचे शस्त्र आहे असे भारतीय मानतात. पण राष्ट्रहितासाठी बळाचा वापर करणे हे शस्त्र न टाळता येणार्‍या डावपेचाचा अविभाज्य भाग आहेत असे चिनी मानतात. युद्ध टाळण्यामध्ये त्यांना अजिबात पुरुषार्थ वाटत नाही, किंबहुना तसे करणे म्हणजे त्यांना नेभळटपणा वाटत असावा.
म्हणून भारताविरुद्ध युद्ध छेडणे आणि त्याच्यामागे आपल्या नागरिकांची शक्ती उभी करणे चिनी राज्यकर्त्यांना कसे सोपे आहे हे लक्षात येईल. पण पराकोटीचा अन्याय झाल्यानंतरही आपल्या राज्यकर्त्याने साम, दाम, दंड, भेद नीतीनेच चालावे असा आग्रह करणार्‍या समाजाला युद्धासाठी तयार करण्याचे काम भारतीय पंतप्रधानासाठी किती अवघड आहे हेही आपल्याला कळेल. दुर्दैव हे आहे की भारतामधल्या डाव्या फुरोगामी फेक्युलरांची एक वेळ चीनकडे पाकिस्तानचे सार्वभौमत्व गेले तरी चालेल अशी मानसिकता झाली आहे. मोदी जिंकले असे चित्र उभे राहण्यापेक्षा चीनचे स्वागत करू आणि हिंदू राष्ट्राचे स्वप्न हाणून पाडू असा घातक विचार ही मंडळी करत आहेत. त्यांचा हिंदू द्वेष-मोदी द्वेष-संघ द्वेष इतका पराकोटीचा आहे की त्यासाठी भारत चीनचा मांडलिक झाला तरी त्यांना चालणार आहे. असलेच बुद्धिमंत, विचारवंत, पत्रकार, फुरोगामी, फेक्युलर मात्र चीनच्या बाजूने आपली भुणभूण सुरूच ठेवतात. मोदी सरकार कसे हटवादी आहे आणि टांग अडवून बसले आहे हे पटवतात. त्यांच्याकडे दुर्लक्ष करणे सर्वात उत्तम मार्ग आहे. ते जरी झाले तरी भारत, चीनला नक्कीच मात देऊ शकेल. आज चीनची धडपड तिबेट वाचवण्याकडे जास्त आहे. भारत, तिबेटला मुक्त करील, अशी धागधुग चीनला आहे. त्यामुळेच चीन जास्त आक्रमक झाला आहे. भले भारतीय राज्यकर्त्यांच्या मनात तिबेट लढ्याबाबत विचार नाही. पण चीन मात्र तिबेटबाबत भारताला घाबरून आहे. ही भीती, दबावाचा वापर योग्य प्रकारे झाला तर चीन बॅकफूटला जाईल हे नक्की. पण त्यासाठी दीर्घकाळ चालणारी रणनीती आणि सशक्त नेतृत्त्वाची गरज आहे. आज ते नेतृत्त्व केंद्रात आहे. त्यामुळे त्यादृष्टीने विचार होऊ शकतो. किंबहुना तो व्हावा.

 

Santosh Malkarhttps://www.mymahanagar.com/author/msantosh/
आपलं महानगर मुंबई आवृत्ती निवासी संपादक. गेली २५ वर्षे पत्रकारितेत आहे. आंतरराष्ट्रीय आणि राष्ट्रीय विषयात लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -