घरफिचर्सपहिले शिक्षणमंत्री मौलाना आझाद

पहिले शिक्षणमंत्री मौलाना आझाद

Subscribe

मौलाना आझाद यांचा जन्म ११ नोव्हेंबर १८८८ रोजी सौदी अरेबिया या देशातील पवित्र भूमी मक्का येथे झाला. त्यांचे वडील मौलाना खैरुद्दीन हे धर्मगुरू होते. ही भूमी मौलाना खैरुद्दीन यांना न मानवल्याने ते आपल्या कुटुंबासह भारतात आले आणि त्यांनी कोलकाता शहरात वास्तव्य केले. मौलाना आझाद लहानपणापासूनच अतिशय हुशार होते. ते इस्लाम धर्माचे आधुनिक विचारवंत होते. आई आणि वडिलांची घराणी कट्टरपंथी असली तरी मौलाना आझाद कट्टरपंथी नव्हते.

मौलाना अबुल कलाम आझाद यांचा आज स्मृतिदिन.‘इंग्रजांना मी सत्ताधारी मानीत नाही तर त्यांना विनंती का करू?’ हे उद्गार मौलाना आझाद यांना इंग्रजांनी अहमदनगर येथील तुरुंगात ठेवले होते त्या वेळी त्यांनी काढले. मौलाना आझाद यांच्या पत्नीचे निधन झाले होते. इंग्रजांनी त्यांना निरोप दिला की, पत्नीच्या दफनविधीसाठी आम्ही तुम्हाला सोडू; पण तुम्ही तसे विनंतीपत्र इंग्रज सरकारला द्या. त्या वेळी मौलाना आझाद यांनी इंग्रजांना असे बाणेदार उत्तर दिले. मौलाना आझाद यांचा जन्म ११ नोव्हेंबर १८८८ रोजी सौदी अरेबिया या देशातील पवित्र भूमी मक्का येथे झाला. त्यांचे वडील मौलाना खैरुद्दीन हे धर्मगुरू होते. ही भूमी मौलाना खैरुद्दीन यांना न मानवल्याने ते आपल्या कुटुंबासह भारतात आले आणि त्यांनी कोलकाता शहरात वास्तव्य केले. मौलाना आझाद लहानपणापासूनच अतिशय हुशार होते. ते इस्लाम धर्माचे आधुनिक विचारवंत होते. आई आणि वडिलांची घराणी कट्टरपंथी असली तरी मौलाना आझाद कट्टरपंथी नव्हते. मौलाना आझाद यांनी इस्लामचा पवित्र धर्मग्रंथ कुराणचा अभ्यास करून त्यावर ‘तर्जुमानुल कुरान’ हे पुस्तकही लिहिले आहे.

मौलाना आझाद यांना अरबी, फारशी, इंग्रजी व उर्दू या भाषा चांगल्या अवगत होत्या व ते चारही भाषांतून लिखाण करीत असत. ते एक उत्कृष्ट वक्तेदेखील होते. त्यांचे भाषण ऐकण्यासाठी हजारोंच्या संख्येने लोक उपस्थित राहत असत. ते हिंदू-मुस्लीम ऐक्याचे प्रतीक होते. अनेक हिंदू विचारवंत त्यांचे चाहते होते. ते भारताच्या स्वातंत्र्यसंग्रामातील एक निष्ठावान शिपाई होते. फारसा गाजावाजा न करता कार्य करीत राहणे हे त्यांचे वैशिष्ठ्य होते. महात्मा गांधी, पंडित जवाहरलाल नेहरू, डॉ. राजेंद्रप्रसाद, अ‍ॅनी बेझंट, लालबहादूर शास्त्री, विठ्ठलभाई पटेल यांच्यासमवेत भारतीय स्वातंत्र्यलढ्यात त्यांनी उडी घेतली. भारत हा आपला देश आहे, त्यावर परकीयांचा ताबा ही दडपशाही आहे, अशी त्यांची भूमिका होती. भारतावर स्वकीयांचीच सत्ता हवी असे त्यांचे मत होते. कष्ट आणि निष्ठा यावर मौलानांची नितांत श्रद्धा होती व शेवटपर्यंत त्यांनी या विचारांवरच वाटचाल केली.

- Advertisement -

१९४७ मध्ये भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर पं. जवाहरलाल नेहरूंनी मौलानांकडे शिक्षण मंत्रालयाचे काम सोपवले व ते स्वतंत्र भारताचे पहिले शिक्षणमंत्री झाले. त्यांनी त्या काळी अत्यंत बिकट परिस्थितीतही भारतात शिक्षणाचा प्रसार व प्रचार उत्तम प्रकारे राबवला. मौलाना आझाद यांना युरोपच्या तत्कालीन समस्यांचे चांगले ज्ञान होते. जर्मन आणि इटलीच्या सत्ताधार्‍यांची दडपशाही संपूर्ण जगासाठी मोठा धोका ठरणार आहे, असे ते सांगत. हिटलरच्या काळात अल्पसंख्याक आणि बुद्धिजीवींची सर्रास कत्तल होईल हे मौलानांनी सांगितले होते आणि तसेच घडले हे जगाने पाहिले. मौलाना आझाद यांना युरोपियन साहित्याचेही चांगले ज्ञान होते. महाकवी बायरन आणि फ्रान्सच्या कादंबरीकारांची त्यांना चांगली माहिती होती. २२ फेब्रुवारी १९५७ रोजी मौलाना अबुल कलाम आझाद यांचे निधन झाले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -