घरफिचर्सजय जय महाराष्ट्र माझा

जय जय महाराष्ट्र माझा

Subscribe

मागील 60 वर्षात महाराष्ट्र राज्याने अशी प्रगतीची कास धरली की आज महाराष्ट्र राज्य देशात सर्वाधिक आघाडीचे राज्य आहे. व्यापार उद्योग म्हणा, तसेच कला, साहित्य, क्रीडा, शिक्षण, आरोग्य सुविधा आणि सगळ्यात महत्वाचे म्हणजे कृषी क्षेत्रासह अनेक क्षेत्रात आपले महाराष्ट्र राज्य आघाडीवर असल्याचे चित्र आपणास पाहायला मिळते. १ मे रोजी महाराष्ट्र दिन तसेच जागतिक कामगार दिवस (आंतरराष्ट्रीय श्रमिक दिन) या दिवशी साजरा केला जातो. 21 नोव्हेंबर 1955 या दिवशी फ्लोरा फाऊंटनच्या परिसरात खूप तणावाचे वातावरण होते. कारण महाराष्ट्राला मुंबई देण्याचे राज्य पुनर्रचना आयोगाने नाकारले होते. त्यामुळे मराठी माणसे खूप चिडली होती. सगळीकडे लहान मोठ्या सभांमधून या निर्णयाचा निषेध होत होता.

शेवटी सगळ्या लहान मोठ्या संघटना मिळून एक विशाल मोर्चा सरकारचा विरोध करण्यासाठी फ्लोरा फाऊंटना समोरील चौकात येण्याचे ठरले. तसेच एका बाजूने प्रचंड जनसमुदाय एका चर्चगेट स्थानकाकडून आणि दुसर्‍या बाजूने बोरी बंदरकडून मोठमोठ्या घोषणा देत फ्लोरा फाऊंटनकडे जमले. सरकारतर्फे हा मोर्चा उधळून लावण्यासाठी लाठीचार्ज करण्यात आला. पण अढळ सत्याग्रहींमुळे पोलिसांचे हे प्रयत्न अयशस्वी झाले आणि पोलिसांना गोळीबाराचा आदेश, मुंबई राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री मोरारजी देसाई यांच्याद्वारे देण्यात आला. गोळीबार झाला आणि संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात 105 आंदोलक शहीद झाले. या शहिदांच्या बलिदानापुढे व मराठी माणसाच्या आंदोलनामुळे सरकारने विचार करून शेवटी 1 मे 1960 रोजी मुंबईसह संयुक्त महाराष्ट्राची स्थापना केली. त्यानंतर 1965 मध्ये त्या जागी हुतात्मा स्मारकाची (शहीद स्मारक ) उभारणी करण्यात आली.

- Advertisement -

1 मे हा दिवस जागतिक कामगार दिनही आहे. इतिहासाची उजळणी केल्यावर आपल्या असे लक्षात येत की जागतिक औद्योगिक क्रांतीनंतर जगभरातून मुख्यतः पाश्चिमात्य जगात रोजगार खूप मोठ्या प्रमाणावर उपलब्ध होऊ लागले. कामगारांकडे काम होते. मात्र, कामगारांचे खूप शोषण होत असे. आपल्या हक्कापासून वंचित असलेल्या त्या कामगारांना 12 ते 16 तास सतत काम करावे लागत असे. कामाच्या ठिकाणी अपघातही व्हायचे. मृत्यूचेही प्रमाण वाढलेले होते. म्हणून या विरोधात कामगार एकजूट झाले आणि त्यांनी आंदोलन केले. जवळपास जगाच्या 80 देशात याचे तीव्र पडसाद उमटू लागले आणि शेवटी कामगारांची कामाची वेळ 8 तास निश्चित करण्यात आली.

यानंतर कामगारांच्या हक्कासंदर्भात दोन आंतरराष्ट्रीय परिषदा झाल्या. नंतर १ मे 1811 पासून कामगार दिन साजरा केला जाऊ लागला. महाराष्ट्रात साजरा होणार्‍या कामगार दिनाला संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीचा संदर्भ आहे. संयुक्त महाराष्ट्राचा लढा वेगवेगळ्या पातळीवर लढला गेला. या लढ्यात कामगारांनी घेतलेला सहभाग अत्यंत महत्वाचा होता. त्यांच्या सहभागामुळेच हा लढा खर्‍या अर्थाने रस्त्या रस्त्यात लढला गेला. याच कारणामुळे 1 मे 1960 रोजी मराठी भाषिकांसाठी स्वतंत्र महाराष्ट्राची निर्मिती झाल्यानंतर त्याच दिवशी महाराष्ट दिन बरोबरच कामगार दिनही मोठ्या उत्साहात साजरा केला जाऊ लागला.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -