घरफिचर्समायमहानगर ब्लॉगमुंबईवरून सावंतवाडीमध्ये पवारसाहेबांचा निरोप घेऊन आलो आणि केसरकर तुम्ही...

मुंबईवरून सावंतवाडीमध्ये पवारसाहेबांचा निरोप घेऊन आलो आणि केसरकर तुम्ही…

Subscribe

मुंबईवरून येऊन सावंतवाडीमध्ये तुम्हाला निरोप द्यायला इतका मोठा मी पक्षामध्ये नव्हतो. त्यामुळे मला साहेबांनी निरोप दिला हे सत्य लपवू नका

– डॉ. जितेंद्र आव्हाड
केसरकर मी आपल्या घरी आलो होतो तो साहेबांचा निरोप घेऊन, की आघाडी धर्मा पाळा. आपली जवळ-जवळ अर्धा तास चर्चा झाली आणि आपण स्पष्ट शब्दांत जी भाषा वापरली ती मी इथे लिहीत नाही. पण मी कुठल्याही परिस्थितीत मेलो तरी चालेल पण, राणेंचा प्रचार करणार नाही, असे सांगून आपल्या दोघांमधील संभाषण थांबले. त्यानंतर मी परत येऊन हाच निरोप आदरणीय शरद पवार साहेबांना दिला. पक्षामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये सगळ्यांना माहीत आहे की, मी सांगितल्याशिवाय इतका मोठा निर्णय घेणार नाही. मुंबईवरून येऊन सावंतवाडीमध्ये तुम्हाला निरोप द्यायला इतका मोठा मी पक्षामध्ये नव्हतो. त्यामुळे मला साहेबांनी निरोप दिला हे सत्य लपवू नका.

त्यानंतर शरद कृषी भवनाच्या उद्घाटनाला आदरणीय शरद पवार साहेब आले. आपण त्या कार्यक्रमाला आलात आणि साहेबांच्या मागून चालण्याचा प्रयत्न केलात. पुढे सगळे कॅमेरावाले फोटो काढत होते, व्हिडीओ शूटिंग करत होते. मी आपल्याला तिथे हटकले हे सत्य आहे आणि तसेही ते मला सूचित करण्यात आले होते म्हणून मी ते काम केले. कारण, त्या फोटोवरून पुन्हा एकदा सिंधुदुर्गामध्ये गैरसमज निर्माण झाला असता. कारण आपण जे केले होते ते उभ्या सिंधुदुर्गाला माहिती होते आणि तुम्हाला तेच करायच होतं. जिल्ह्यात आणि महाराष्ट्रभर गैरसमज निर्माण करून द्यायचे होते. तो मी नव्हेच असे चित्र तुम्हाला सिंधुदुर्गामध्ये निर्माण करायचे होते. आपल्याला हटकल, आपल्याला बाजूला केलं ह्याचे मला अजिबात दु:ख नाही. कारण, साहेबांचा निरोप धुडकावल्यानंतर तुम्हाला साहेबांच्या बाजूला किंवा मागे चालण्याची गरजच नव्हती. त्यामुळे केलेल्या गोष्टीची मला खंत नाही. उगाच खोटा आव आणायचा होता आणि तुम्हाला पक्ष सोडायचा होता. तुमचे ते आधीच ठरलेले होते. तुम्हाला फक्त कारण लागत होतं आणि ते कारण तुम्ही जितेंद्र आव्हाड यांच्यावर बिल फाडून मोकळे झालात.

- Advertisement -

हिंमत होती तर राणेंचा प्रचार करणार नाही, मी या पक्षात राहणार नाही, असा निर्णय का नाही घेतलात, अधिक इतिहासात मला जायला लावू नका. आज एवढे बोललो… याच्यानंतर परत तुमच्याबद्दल एक अवाक्षर ही काढणार नाही. कारण, सत्य सांगणं ही काळाची गरज होती. ते मी आज सांगितले.

तुम्ही आज मला खोटे ठरवण्याचा प्रयत्न केला म्हणून हे सत्य कथन आहे. उद्धव ठाकरेंबद्दल बोलाल तर खबरदार ही तुमची भूमिका कौतुकास्पद आहे, आपण त्यांना 2014 साली भेटलात पण ज्या पवारसाहेबांनी आपले आयुष्य घडविले त्यांच्याबद्दल आपण जे बोललात ते न पटल्यामुळे मी आपल्याबद्दल बोललो, गेली 7.6 वर्षं आपण मला दोष देत होतात, मी लक्षही देत नव्हतो, जेव्हा तुम्ही साहेबांबद्दल बोललात तेव्हा मी उठलो. साहेबांबद्दल बोलू नका… बस

- Advertisement -

 

Jitendra Awhad
Jitendra Awhadhttps://www.mymahanagar.com/author/jitendra-awhad/
डॉ. जितेंद्र आव्हाड हे राज्याचे माजी गृहनिर्माण मंत्री असून ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील प्रमुख नेते आहेत. डॉक्टरेट मिळवलेले आव्हाड विविध विषयांवर लेखन करत असतात. त्या लेखांचा समावेश इथे केलेला आहे. लेखामधील मते ही डॉ. जितेंद्र आव्हाड यांची वैयक्तिक मते आहेत.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -