– आशिष निनगुरकर
आजच्या काळात मनोज वाजपेयींच्या श्रेणीतला गुणी अभिनेता मिळणं खूपच अवघड आहे, जे व्यक्तिरेखा अशा प्रकारे साकारतात की त्यांना पडद्यावर पाहताना आपणही ते मनोज वाजपेयी आहेत हे विसरून जातो. इथेही त्यांनी तेच केलं आहे. त्यांनी या चित्रपटात अप्रतिम पद्धतीनं क्राईम रिपोर्टरची भूमिका साकारली आहे आणि त्यांची साथ दिली आहे ती शहाना गोस्वामी आणि अर्चिता अग्रवाल यांनी. या स्टार्सचा अप्रतिम अभिनय हेच हा चित्रपट पाहण्याचं कारण आहे, असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. तुम्ही हा चित्रपट झी ५ वर पाहू शकता.
डिस्पॅच नावाच्या वृत्तपत्रात मनोज वाजपेयी म्हणजेच जॉय बाग क्राईम रिपोर्टर म्हणून काम करीत असतात. त्यांचे पत्नी शहाना गोस्वामी म्हणजेच श्वेता बागसोबत सारखे खटके उडत असून आता प्रकरण अगदी घटस्फोटापर्यंत जाऊन पोहचलं आहे. तसेच त्याचदरम्यान जॉय बागचं अर्चिता अग्रवाल म्हणजेच प्रेरणा प्रकाश हिच्याशी सूत जुळतं आणि दोघांचं अफेअर सुरू असतं.
क्राईम रिपोर्टर म्हणून जॉय बाग एका अंडरवर्ल्डच्या बातमीवर काम करीत असतो, पण तेवढ्यात २जी घोटाळ्याचे अपडेट्स मिळतात. मग काय होतं? ही एक बातमी कशी जॉय बगाच्या आयुष्यात वादळ घेऊन येते, हेच या चित्रपटात दाखवण्यात आलं आहे. हा चित्रपट फक्त आणि फक्त चित्रपटातील स्टार कास्टच्या अभिनयासाठी पाहता येऊ शकतो. दिग्दर्शकांना चित्रपटाच्या कथेला अजिबातच नीट विणता आलेलं नाही. कुठेही काहीही घडतंय.
पटकथा खूपच कमकुवत आणि हो मीडियाच्या कामाची पद्धत दाखवण्याचा प्रयत्न केला गेला आहे, पण अनेक ठिकाणी हा चित्रपट जग्गा जासूस झाल्याचं पाहायला मिळतंय. या चित्रपटाला जर आणखी चांगल्या पद्धतीनं लिहिता आलं असतं, तर चित्रपट अप्रतिम झाला असता, मनोजसारख्या दिग्गजाचा अप्रतिम अभिनय वाया गेला आहे. कथेचा शेवट समजतच नाही. चित्रपटात अजून मसाला टाकण्याची गरज होती. अनेक ठिकाणी चित्रपट आवश्यकतेपेक्षा संथ वाटला आहे.
मनोज वाजपेयींचे नाव ऐकून कुटुंबासोबत चित्रपट पाहावासा वाटला, पण तसे झाले नाही. कारण चित्रपटात अगदी सुरुवातीपासूनच इंटिमेट सीन्स सुरू झाले होते आणि शेवटपर्यंत त्यात कोणतीही कमी सोडली नाही. त्यामुळे फॅमिलीबरोबर बसून पाहण्यासारखा हा सिनेमा नाही. मनोज बायपेयीने डिस्पॅच चित्रपटात गुन्हेगारी रिपोर्टर जॉयची भूमिका साकारली आहे. जॉय पत्रकार आहे की पोलीस असा संभ्रम अनेक वेळा होतो.
कारण पोलीस ठाण्यात घुसून गुन्हेगाराला मारहाण करून त्याची चौकशी करण्याचा अधिकार पत्रकाराला आहे असे घडत नाही. अशा स्थितीत हे दृश्य अजिबात पचनी पडणार नाही. एका बाजूला जॉयची बायको आणि दुसर्या बाजूला त्याची मैत्रीण. तो त्याच्या बायकोशीही एकनिष्ठ नाही आणि त्याची मैत्रीणसुद्धा त्याला मध्यंतरी फसवते. अशा परिस्थितीत जॉयची स्वतःची कोणतीही भूमिका नाही हे दाखवण्यात आले आहे. डिस्पॅचची कथा एका क्राईम रिपोर्टरची आहे, जो अचानक क्लिच दिसला.
ना कथेत ताकद होती, ना कोणत्याही अभिनेत्याचा अभिनय दमदार. पाहिले तर फक्त इंटिमेट सीन आणि ऐकले तर अनलिमिटेड शिव्या. कारण कुठेही क्राईम रिपोर्टरचे पात्र मनोज वाजपेयी यांच्यावर चित्रीत करण्यात आले होते. जॉय बनलेल्या मनोज बाजपेयीने त्याच्या चाहत्यांची खूप निराशा केली. झी ५ वरचा हा चित्रपट लोकांना अजिबात आवडलेला नाही. चित्रपटाच्या कथेवर जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला जात असल्याचे कुठेतरी दिसते. चित्रपट सुरुवातीपासूनच कंटाळवाणा होता. शेवटी काही इंटरेस्टिंग ट्विस्ट येईल या आशेने चित्रपट पाहिला पण तोही बकवास होता.
मनोज वाजपेयींचा अभिनय कमाल आहे. मनोज वायपेयींनी या चित्रपटात अनेक ठिकाणी खूपच बोल्ड सीन्स दिले आहेत, जे यापूर्वी त्यांनी कधीच दिलेले नाहीत. ते स्क्रिनवर तुम्हाला एका वेगळ्याच गोष्टीचा अनुभव देतात. ते एखाद्या क्राईम रिपोर्टरसारखे दिसतात. ते बाईकवरुन जात असताना काही गुंड त्यांच्या मागे येतात. बाईक चालवताना त्यांच्या चेहर्यावर दिसणारी भीती अप्रतिम आहे. शहाना गोस्वामीनं मनोजच्या बायकोच्या भूमिकेत अप्रतिम काम केलं आहे.
शहाना गोस्वामीनं एका अशा पत्नीची भूमिका साकारली आहे, जी तिच्या पतीला अजिबातच आवडत नाही. चित्रपटात एक सीन आहे, आपल्या नवर्यासोबत इंटिमेट असताना मनोज वाजपेयी तिला शिवीगाळ करतात. त्यावेळी शहानाच्या चेहर्यावरचे भाव अप्रतिम आहेत. अर्चिता अग्रवाल नवीन आहे पण ती मनोज आणि शहानासमोर फिकी पडत नाही. एका सीनमध्ये ती एका सोसायटीच्या अधिकार्याला फटकारते, जो तिला भाड्यानं फ्लॅट घेण्याऐवजी निरुपयोगी नियम आणि कायदे समजावून सांगतो. हे दृश्य आजच्या एका कणखर स्त्रीचं प्रतिबिंब अधोरेखीत करतं. अर्चिताचं काम खूप चांगले आहे आणि तिला भविष्यात भरपूर वाव आहे.
डिस्पॅच कनू बहल यांनी दिग्दर्शित केला आहे आणि त्यांनीच इशानी बनर्जीसोबत याचं लेखनही केलं आहे आणि हाच फिल्मचा सर्वात कमजोर पॉईंट आहे. चित्रपटाच्या रायटिंगमध्ये खूप काही मिसिंग आहे तसेच आणखी मसाल्याचीही गरज होती. फिल्म कमर्शियल करण्यासाठी आणखी काही गोष्टींची गरज होती किंवा कथेची मांडणी नीट करायला हवी होती. एंडिंग तर खूपच खराब आहे. एकूणच पाहता मनोज वाजपेयींना पाहायचं असेल तर चित्रपट बिनधास्त पाहू शकता. त्यांच्या अभिनयासाठी पाहायचा असेल तर बिनधास्त पाहा.
-(लेखक चित्रपट अभ्यासक आहेत.)