घरफिचर्सनाट्यनिर्माते प्रभाकर पणशीकर

नाट्यनिर्माते प्रभाकर पणशीकर

Subscribe

प्रभाकर विष्णू पणशीकर तथा पंत यांचा आज स्मृतिदिन. प्रभाकर पणशीकर हे मराठी रंगभूमीवरील अभिनेते, दिग्दर्शक आणि नाट्यनिर्माते होते. त्यांचा जन्म 14 मार्च 1931 रोजी मुंबईत फणसवाडी येथे वेदविद्यासंपन्न ब्राह्मण कुटुंबात झाला. पंतांचे वडील विष्णुशास्त्री हे दशग्रंथी ब्राह्मण होते, तर त्यांचे आजोबा वासुदेवशास्त्री हे संस्कृतचे प्रकांड पंडित होते. लहानग्या प्रभाकरचा ओढा मात्र नाट्यक्षेत्राकडे होता. शाळेत असताना वेगवेगळ्या प्रसिद्ध नाटक कंपन्यांची नाटके त्यांनी पाहिली. एवढेच नव्हे तर ती नाटके पुढे गिरगावात गणेशोत्सवात सादर केली. त्यामुळे पौगंडावस्थेतच त्यांना घरापासून परागंदा व्हावे लागले.

१३ मार्च १९५५ या दिवशी ‘राणीचा बाग’ या नाटकाद्वारे पणशीकरांनी मराठी रंगभूमीवर प्रवेश केला. वयाच्या पंचविशीत त्यांनी लेखक-दिग्दर्शक मो.ग.रांगणेकरांच्या ‘नाट्यनिकेतन’ या संस्थेत प्रवेश केला आणि ‘कुलवधू’, ‘भूमिकन्या सीता’, ‘वहिनी’, ‘खडाष्टक’ अशा नाटकांमधून कामे करण्यास सुरुवात केली. प्रल्हाद केशव अत्रे लिखित ‘तो मी नव्हेच’ या नाटकात साकार केलेल्या पाच वेगवेगळ्या भूमिकांमुळे ते संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध झाले. इथे ‘ओशाळला मृत्यू’ या संभाजी महाराजांच्या मृत्यूवरील आधारित नाटकातील औरंगजेबाची भूमिका त्यांनी केली. त्यांनी स्थापन केलेल्या नाट्यसंपदा या नाट्यंसंस्थेचे ‘कट्यार काळजात घुसली’ हे संगीतनाटक विशेष लोकप्रिय झाले.

- Advertisement -

पणशीकरांनी त्यांच्या ५० वर्षांच्या कारकिर्दीत नाटकांचे सुमारे ८००० च्या वर प्रयोग केले. मराठीसोबतच गुजराती व कन्नड भाषेतही त्यांनी अभिनय केला. ४ मराठी चित्रपट, ४ मराठी मालिका यांसोबतच एक इंग्रजी मालिका केली आणि रेडिओसाठी तर असंख्य नाट्यवाचने केली. विद्याधर गोखले लिखित ‘अमृत झाले जहराचे’ आणि वसंत कानेटकर यांचे ‘मोहिनी’ अशी दोन नाटके ‘नाट्यसंपदे’ने रंगमंचावर आणली. त्यानंतर ‘मला काही सांगायचंय’ आणि ‘इथे ओशाळला मृत्यू’ या नाटकांच्या निर्मितीने ‘नाट्यसंपदे’ला स्थैर्य, आर्थिक यश आणि प्रसिद्धी मिळवून दिली. अशा या लोकप्रिय नाट्यनिर्मात्याचे 13 जानेवारी 2011 रोजी निधन झाले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -