हिंदू धर्मातील भाद्रपद महिन्याच्या पौर्णिमेपासून ते भाद्रपद अमावस्येपर्यंत या पंधरा दिवसांच्या काळात पितृ पंधरावडा म्हणजेच पितृपक्ष केले जाते. पूर्वजांच्या आत्म्याला शांती मिळावी त्यासाठी या काळात कुटुंबातील मृत व्यक्तिंचे स्मरण करून त्यांच्या नावाने श्राद्ध, पूजा केली जाते. त्यामुळेच हिंदू धर्मात पितृपक्षावला विशेष महत्व आहे. यंदा पितृपक्ष 10 सप्टेंबर रोजी सुरू होणार असून 25 सप्टेंबर रोजी संपणार आहे.
असं म्हणतात की, पितृपक्षाच्या काळात आपले पूर्वज धरतीवर येतात. या काळात तर्पण, पिंडदान केल्यास त्यांच्या आत्म्यास शांती मिळते. पितृदोषापासून मुक्ति मिळावी म्हणून हा काळ खूप महत्वपूर्ण मानला जातो. तसेच पूर्वजांचे श्राद्ध केल्यास घरामध्ये सुख-समृद्धी येते.
- Advertisement -
कोणत्या ठिकाणी करू नये श्राद्ध
- दुसऱ्यांच्या जागेवर
शास्त्रानुसार, अश्या जागेवर कधीही आपल्या पूर्वजांचे श्राद्ध करू नये. जी जागा इतर कोणाच्या मालकीची असेल. - अपवित्र जागेवर
शास्त्रानुसार, श्राद्ध कधीही अपवित्र जागेवर करू नये. - स्मशान
शास्त्रानुसार, ज्या जागेवर स्मशान भूमी अशा ठिकाणी देखील श्राद्ध करू नये. - देव स्थानावर
कोणत्याही मंदिरामध्ये देखील कधीही श्राद्ध कर्म करू नये.
या ठिकाणी श्राद्ध करणं मानलं जात शुभ
- Advertisement -
- घरामध्ये
शास्त्रानुसार, घरातील स्वच्छ जागेवर श्राद्ध केल्यास त्याचा चांगला परिणाम तुम्हाला पाहायला मिळेल. परंतु श्राद्ध करताना तुमचा चेहरा दक्षिण दिशेकडे असावा. - नदीच्या किनाऱ्यावर
कोणत्याही नदीच्या किनाऱ्यावर श्राद्ध करणं सर्वोत्तम मानले जाते. - वडाच्या झाडाखाली
शास्त्रामध्ये वडाच्या झाडाला पवित्र झाडं मानले जाते. त्यामुळे या झाडाखाली श्राद्ध करणं देखील शुभ मानले जाते. - तीर्थस्थळांवर
तीर्थस्थळांवर देखील श्राद्ध करणं शुभ मानलं जातं.
हेही वाचा :
पितृ दोष म्हणजे काय? जाणून घ्या माहिती