हिंदू धर्मात ज्योतिष शास्त्राप्रमाणेच हस्तरेषा शास्त्राचे महत्त्व देखील सांगण्यात आले आहे. हस्तरेषा शास्त्रामध्ये आपल्या तळहातावरील रेषा, आकृत्या, चिन्ह या सर्वांचे निरिक्षण करून त्यांच्या स्थितीच्या आधारावर व्यक्तीचा स्वभाव, गुण आणि भविष्य सांगण्यात येते. हातांच्या रेषांच्या आधारे व्यक्ती कसे आयुष्य जगेल, त्याची आर्थिक परिस्थिती कशी असेल, त्याचे करिअर, वैवाहिक जीवन, कुटुंब, आरोग्य यांसारख्या अनेक गोष्टी तुम्ही जाणून घेऊ शकता.
हस्तरेखा शास्त्रात काही रेषांना खूप महत्त्वपूर्ण मानले जाते. त्यांपैकी-हृदय रेषा (heart line), जीवन रेषा (life line), विवाह रेषा (marriage line) आणि भाग्य रेषा (fate line).या रेषांच्या स्थिती वरून सहज लक्षात येते की, ते आपल्याला शुभ फळ देणार की अशुभ. मात्र प्रत्येक व्यक्तीच्या हातावर या सर्व रेषा नसतात. असं खूप कमी पाहायला मिळते की, या सर्व रेषा एखाद्या व्यक्तीच्या हातावर असतात.
हस्तरेषा शास्त्रानुसार ज्या व्यक्तीच्या तळहातावर M या ही रेष असते त्यांना आयुष्यात कधीही पैशांची कमतरता भासत नाही. असे लोक लाखात एक असतात. तसेच या लोकांना त्यांच्या आयुष्यात सुखी सुविधा प्राप्त करतात.
तळहातावरील M रेषा
- ज्यावेळी तुमच्या हातावरील हृदय रेषा, बुद्धी रेषा आणि जीवन रेषा एकत्र येऊन तळहातावर M रेष तयार होते.
- ज्या व्यक्तींच्या हातामध्ये असा M दिसतो. असे लोक खूप नशीबवान मानले जातात. मुळात असे खूप कमी लोक असतात, ज्यांच्या हातामध्ये M तयार होतो.
- असे व्यक्ती त्यांच्या करिअरमध्ये खूप यश प्राप्त करतात. या लोकांचा अनेकजण आदर्श घेतात.
- या व्यक्तींमध्ये समोरच्या पारखण्याचा उत्तम गुण असतो. अश्या लोकांमध्ये संवाद कौशल्य उत्तम असते.
- ज्या व्यक्तींच्या हातामध्ये असा M असतो, हे व्यक्ती कोणत्याही कामात पटाईत असतात.
- या लोकांमध्ये कल्पनाशक्ती उत्तम असते, असे व्यक्ती लेखन, साहित्य क्षेत्रात आपलं नाव मोठं करतात.
- तसेच या लोकांचा प्रेम विवाह होण्याची जास्त शक्यता असते. यांचे वैवाहिक आयुष्य देखील उत्तम असते.