सध्या सगळीकडे चैत्र नवरात्रीचा उत्साह सुरु आहे. नवरात्रीच्या काळात अनेकजण 9 दिवसांचा उपवास करतात. उपवासामुळे शरीर आणि मनाला अनेक फायदे होतात. उपवासात केवळ फलाहाराचे सेवन केले जाते. मात्र, कधी कधी अनेकांना उपवासामुळे अशक्तपणा येतो. त्यामुळे उपवासात नेहमी योग्य पदार्थांचे सेवन करावे.
उपवासात आहाराची घ्या काळजी
- आंबट फळांपासून दूर राहा
उपवासाच्या काळात उपाशी पोटी संत्री, द्राक्षे, लिंबूचे सेवन केल्याने अॅसिडिटी होऊ शकते. या फळांऐवजी तुम्ही केळी, सफरचंद, टरबूजाचे सेवन करु शकता.
- हायड्रेटेड राहा
उपवासाच्या काळात हायड्रेटेड राहणं गरजेचं आहे. जेव्हा तुम्ही उपवास करता त्यावेळी थंड पाण्याऐवजी गरम पाणी किंवा कोमट पाण्याचा वापर करा. या काळात थोडं-थोडं पाणी प्या. एकदम जास्त पाण्याचे सेवन करु नका.
- फायबरयुक्त पदार्थ खा
उपवासाच्या काळात अधिक फायबरयुक्त पदार्थांचे सेवन करा. यात तुम्ही राजगिरा, साबुदाणा, वरई, मखाणाचे सेवन करु शकता.
- हेल्दी ज्यूस प्या
उपवासाच्या काळात दूध, नारळ पाणी, ताक, लस्सी, फळांच्या रसाचे सेवन करा.