वयानुसार व्यक्तीच्या खाण्या-पिण्याची आवड देखील बदलते. मात्र, आवडीसोबत आरोग्याची देखील योग्य काळजी घेणं गरजेचं असतं. वयाच्या पस्तीशीनंतर अनेक समस्यांचा सामना करावा लागतो. अशावेळी योग्य आहार निवडावा.
वयाच्या पस्तीशीनंतर खाऊ नका ‘हे’ पदार्थ
- फास्ट फूड
फास्ट फूडचे अधिक सेवन सर्वांच्याच आरोग्यासाठी घातक असते. वयाच्या पस्तीशीनंतर फास्ट फूडचे अधिक सेवन करु नये.
- जास्त मीठ
वाढत्या वयात रक्तप्रवाह वाढण्याची समस्या होते. यामुळे कमी प्रमाणात मीठाचे सेवन करावे. ज्यामुळे हृदय आणि मुत्रपिंड निरोगी राहील.
- बटर
बटरचे सेवन केल्याने कोलेस्ट्रॉल आणि ट्रान्सफॅटचे प्रमाण खूप वाढते. ज्यामुळे शरीरातील एक्स्ट्रा फॅट वाढते. वयाच्या पस्तीशीनंतर बटरचे सेवन अधिक प्रमाणात करु नये.
- जास्त साखर
जास्त साखरेचे सेवन कधीच फायदेशीर नसते. कारण यामुळे मधुमेहाची समस्या निर्माण होते. साखरे ऐवजी तुम्ही गुळाचा वापर करु शकता.
- वाईन
वाईनचे जास्त प्रमाणातील सेवन नेहमी आरोग्यासाठी घातक ठरते. यामुळे हृदय आणि लिव्हरवर वाईट परिणाम होतो.
हेही वाचा :