Wednesday, January 15, 2025
Homeमानिनीरोज पाणी टाकूनही तुळस सुकतेय? मग 'हे' उपाय करा

रोज पाणी टाकूनही तुळस सुकतेय? मग ‘हे’ उपाय करा

Subscribe

आजही अनेक घरांमध्ये तुळशीला अनन्यसाधारण महत्त्व आहे. जिथे सनातन धर्मात तिला देवीची उपाधी मिळाली आहे तिथे तिला आयुर्वेदात ‘औषधींची राणी’ असेही म्हणतात. तुळशीला जितके धार्मिक महत्त्व आहे, तितकेच तुळशीमध्ये असणाऱ्या गुणधर्मामुळे आरोग्याला होणाऱ्या फायद्यासाठीही महत्त्व आहे. पण आपल्या कुंडीत लावलेली तुळस पुन्हा पुन्हा कोमेजते याचाही अनेकांना त्रास होतो. कितीही पाणी टाकले तरी ते सुकते. अशा परिस्थितीत आम्ही तुम्हाला असेच काही उपाय सांगत आहोत, ज्याच्या मदतीने तुम्ही तुळशीचे रोप दीर्घकाळ हिरवे ठेवता येईल. तसेच, जर तुळस आधीच सुकलेली असेल तरीही ती पुन्हा बहरेल.

  • तुळस जेव्हा तुम्ही लावणार असाल तेव्हा तुळशीसाठी नेहमी खोलगट कुंडीचा वापर करावा. 12 इंचाची झाडाची कुंडी तुळशीसाठी योग्य ठरते. तुळस उगविण्यासाठी यामध्ये अधिक जागा मिळते आणि हवाही मिळते. जर कुंडी लहान असेल तर तुळस व्यवस्थित उगवू शकत नाही.
  • वारंवार तुळस सुकण्यामागे अनेक कारणे असून शकते. यामध्ये गरजेपेक्षा जास्त पाणी, खत टाकणे किंवा कमी ऊन मिळणे मुख्यत: समाविष्ट असते. त्यशिवाय किड लागल्यामुळे देखील तुळस सुरकू लागते.
  • तुळस पुन्हा हिरवीगार दिसण्याची शक्यता तेव्हा जास्त असते तेव्हा त्याचे देठामध्ये ताजेपणा शिल्लक असतो. अशा स्थितीमध्ये तुळस पुन्हा हिरवीगार करण्यासाठी तुम्ही शेण आणि कडूलिंबचा पाला वापरू शकता.
  • तुळस सुर्यकिरणांमध्ये खूप चांगल्या प्रकारे वाढते. चांगल्या वाढीसाठी तुळशीच्या रोपाला ६-८ तास ऊन मिळण्याची आवश्यकता असते. त्यामुळे मोकळ्या जागी तुळस ठेवली पाहिजे जेणेकरून तिच्या गरजा पूर्ण होतील.
  • पण हे एका खास पद्धतीने वापरावे लागते. त्यासाठी शेण आधी सुकवा आणि मग त्याचा चुरा तयार रोपाच्या मातीत टाका. कडूलिंबची पाने देखील व्यवस्थित सुकवून त्याचे पावडर तयार करून मातीत टाका. असे केल्याने पोषकतत्व मुळांपर्यंत पोहचतात आणि रोप पुन्हा हिरवे दिसू लागते.

​या गोष्टी लक्षात ठेवा

  • आठवड्यातून एकदा तुळशीच्या रोपाची छाटणी करा
  • कुंडी बदलताना ज्याच्या मुळांना सावधगिरीने काढा
  • पानांना छिद्र असेल तर पाणी आणि एक चमचा डिश डिक्विड टाकून पेस्ट कंट्रोल करा.

Manini