सध्याचा काळ पूर्णपणे तंत्रज्ञानाने भरलेले आहे. आपल्या सभोवताली असलेला मोबाईल, लॅपटॉप, टीव्ही आपल्याला आजूबाजूच्या जगातील नवनवीन गोष्टींची माहिती देण्यास मदत करतात. परंतु या सर्वांचा अतिवापर करुन आपण स्वतःचे प्रचंड किती नुकसान करुन घेतो. आपल्यापैकी बरेच जण विणाकारण तासन् तास सोशल मीडियावर वेळ वाया घालवतात. डिजिटायझेशनचे काही फायदे असले तरी त्याचा अतिवापर घातक ठरतो. अनेकांना यामुळे मानसिक तणावाचा सामना देखील भोगावा लागतो.
परंतु अनेकांना लागलेले सोशल मीडियाचं व्यसन सहज सुटत नाही. ते सोडवण्यासाठी आज आम्ही तुम्हाला काही खास टिप्स देणार आहोत.
- Advertisement -
सोशल मीडियाचं व्यसन कसं सोडवाल?
- ऑफिसचे काम संपल्यानंतर फोन, लॅपटॉप बंद करुन पूर्णवेळ स्वतःला आणि आपल्या कुटुंबियांना द्या. थोडा वेळ आराम करा.
- Advertisement -
- या वेळात एखादे पुस्तक वाचा ऑफिसनंतर कॉल्स आणि मेसेजला उत्तर देणे तुमच्यासाठी आवश्यक असले तरी त्यांचा वेळ कमी ठेवा आणि काही काळ तुमचा फोन बंद ठेवा.
- आजच्या डिजिटल युगात, ईमेल, सोशल मीडिया किंवा टेक्स्ट मेसेजद्वारे संवाद अधिक होऊ लागला आहे. मित्र-मैत्रिणींसोबत चॅट करण्यापेक्षा मोकळ्या वेळात त्यांना भेटून त्यांच्यासोबत मनसोक्त गप्पा मारा.
- डिजिटल तणावापासून दूर राहण्यासाठी तुमच्या शरीराला आणि मनाला विश्रांती द्या. तुम्हाला ई-मेल, सोशल मीडियाच्या जगातून बाहेर पडण्याची गरज आहे. हे करण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे दररोज थोडा ब्रेक घेणे आणि तो वेळ स्वतःवर लक्ष केंद्रित करण्यासाठी वापरणे.
- सोशल मीडियापासून दूर राहण्यासाठी तुम्ही मोकळ्या वेळात शांत झोप घ्या.
- मोकळ्या वेळात सोशल मीडिया चाळण्यापेक्षा ध्यान धारणा करा. मंत्राचा जप स्तोत्राचे पठण करा.