अनेकदा जेवण करताना गृहिणींना अनेक अडचणींना सामोरे जावे लागते. अशावेळी खास किचन टिप्स लक्षात असल्यास त्याचा चांगलाच फायदा होतो.
- चहा करताना किसलेले आले शेवटी घातल्यास त्याचा स्वाद चहाला अधिक लागतो.
- इडली, डोसा आणि आप्पे करताना तांदूळ आणि उडीद डाळ यांच्यासोबत अर्धी वाटी सोयाबीन भिजवा. यामुळे पोषणमूल्य वाढते.
- अननसाचा शिरा करताना त्याचे तुकडे साखरेत शिजवून मग शिऱ्यात घाला. त्यामुळे आंबटपणा येत नाही. शिवाय इसेन्सही घाला.
- कणिक भिजवताना अर्ध पाणी आणि अर्ध दूध घातल्यास पोळ्या मऊ आणि चविष्ट होतात. तसेच रंग चांगला येतो.
- पुऱ्या करताना पिठात दोन चमचे बेसन घातल्यास पुऱ्यांना रंग छान येतो आणि चांगली चवही येते.
- नासलेल्या पोळ्यांना कुकरमध्ये १ – २ शिट्टया देऊन उकडून घ्याव्यात आणि तेलाने तव्यावर कडक भाजून घ्याव्या अशा पोळया रूचकर आणि नरम लागतात यास खाण्यासाठी आरामात वापरू शकता.
- जर तुम्हाला नारळाचे समान दोन भाग करायचे असतील तर त्यावर आपले बोट ठेवून जेथून तोडायचे आहे तेथे बोट ठेवावे आणि नंतर जोराने आपटावे, नारळ तेथूनच तुटेल याची खात्री आहे.
- तांदुळ शिजवताना कुकरमध्ये १ चमचा लिंबू रस घातल्यास भात मोकळा होतो.
- टमाटरचा पल्प काढण्यासाठी कुकरमध्ये मीठ आणि पाण्यात उकळावे त्यानंतर त्याची साल पटकन काढता येते. याचा उपयोग टमाटर सूप, ग्रेवी आणि ज्यूससाठी करता येतो.