अनेकदा जेवण करताना गृहिणींना अनेक अडचणींना सामोरे जावे लागते. अशावेळी खास किचन टिप्स लक्षात असल्यास त्याचा चांगलाच फायदा होतो.
- लोणी नेहमी निर्लेपच्या फ्राई पैनमध्ये कढवा. भांड्याला बेरी अजिबात चिटकत नाही आणि भांडे त्वरित स्वच्छ होते.
- लाडू वड्या करताना पाकात पाण्याऐवजी दूध वापरले तर खव्यासारखी चव येते.
- वड्या करताना मिश्रण सैलसर झाल तर परत थोड भिजवून मिल्क पावडर आणि पिठीसाखर घालून वड्या थापाव्या.
- करंजी, शंकरपाळी, चिरोटे या पदार्थांसाठी शक्यतो तुपाच मोहन वापराव पदार्थ जास्त खुसखुशीत होतात.
- अनारसा तुपात टाकल्यानंतर विरघळला तर मिश्रणात थोडी तांदळाची पिठी मिसळावी. तर अनारसा तळताना जाळी कमी पडल्यास खसखशित थोडी साखर घालून त्यावर अनारसा थापावा.
- घरात किंवा स्वयंपाक घरात मोर पिसे ठेवल्यास पाली नाहीशा होतात.
- घराच्या कोपऱ्यामध्ये बोरिक पावडर टाकून ठेवल्यास झुरळे पळवता.
- मिक्सरची पाती धारदार ठेवण्याकरिता महिन्यातून किमान एकदा तरी साध मीठ ग्राईण्ड कराव.
- कांदे आणि बटाटे एकत्र साठवू नये त्यानी बटाटे जास्त काळ चांगले राहत नाही.
- कापलेल सफरचंद लाल होण्यापासून वाचण्याकरिता त्याला किंचीत लिंबाचा रस लावा.