घरलाईफस्टाईलमहिलांनो सावधान, या तीन महिन्यात गर्भधारणा होणे धोकादायक

महिलांनो सावधान, या तीन महिन्यात गर्भधारणा होणे धोकादायक

Subscribe

गर्भवती महिलांनी स्वतःची जास्तीत जास्त काळजी घेणे गरजेचे आहे. या संदर्भांत अमेरिकेमध्ये करण्यात आला. तब्बल आठ वर्षे या रिसर्चवर अभ्यास सुरु होता आणि या रिसर्च नुसार सहा हजार महिलांचे सर्वेक्षण केले.

अनेक कपल्स बेबी प्लॅनिंग करत असतात. त्यासाठी तज्ज्ञांचा योग्य तो सल्ला सुद्धा घेतात. पण या संदर्भात शास्त्रज्ञ म्हणतात, की उन्हाळ्याचे महिने हे गर्भवती महिलांसाठी जास्त काळजी घेण्यासारखे असतात. कारण उन्हाळ्यामध्ये मिसकॅरेज होण्याचे प्रमाण जास्त असते. आणि त्या मागे काही वैज्ञानिक करणे सुद्धा आहेत. त्यामुळे गर्भवती महिलांनी स्वतःची जास्तीत जास्त काळजी घेणे गरजेचे आहे. या संदर्भांत अमेरिकेमध्ये करण्यात आला. तब्बल आठ वर्षे या रिसर्चवर अभ्यास सुरु होता आणि या रिसर्च नुसार सहा हजार महिलांचे सर्वेक्षण केले.

आणखी वाचा –  ‘सरोगसी पॅरेंट्स म्हणजे रेडिमेड मुलं’, सरोगसीद्वारे पालक बनणाऱ्या सेलिब्रिटींवर लेखिकेचा निशाणा?

- Advertisement -

 

आणखी वाचा – सोनम कपूर होणार आई; बेबी बंप सोबतचे फोटो केले शेअर

- Advertisement -

 

या रिसर्च नुसार गर्भवती महिल्यांच्या मिसकॅरेजचा दर जून, जुलै आणि ऑगस्ट या महिन्यात सर्वाधिक आहे. आगस्ट महिन्यातील मिसकॅरेज दर हा फेब्रुवारी महिन्याच्या तुलनेत ४४ टक्क्यांनी वाढलेला दिसला. गर्भवती महिलांच्या आठ महिने पूर्ण झाल्यावर सर्वाधिक गर्भधारणा होते असे रिसर्च मधील अभ्यासात समोर आले. या संदर्भात तज्ज्ञांचं असं म्हणणं आहे की सर्वाधिक गर्भधारणा ह्या जास्त उष्ण वातावरण आणि लाईफ स्टाईल यामुळे होतात. यातही तज्ज्ञांचं असं म्हणणं आहे की यासाठी सुद्धा आणखी एक वेगळा रिसर्च होणे गरजेचे आहे.

आणखी वाचा – Workout Tips: व्यायाम करायला तासनतास वेळ नाही? २ मिनिटांच्या ‘या’ टिप्सने ठेवा…

 

बोस्टन विश्वविद्यालयच्या प्रोफेसर डॉ. अमेलिया वेसेलिंक म्हणाल्या, की या रिसर्च मध्ये असे समोर आले की अर्ली मिसकॅरेजचा धोका उन्हाळ्याच्या महिन्यात असतो. त्याचबरोबर अमेलिया म्हणाल्या की उन्हाळ्याच्या दिवसात गर्भवती महिलांना आणखीही काही समस्यांचा सामना करावा लागतो. त्यात वेळे आधी मुल जन्माला येणे त्याचबरोबर जन्माच्या वेळी बाळाचे वजन कमी असणे आणि त्याच सोबत पोटातच बाळाचा जन्म होणे या सारख्या समस्यांना सामोऱ्या गेलेल्या मतांचा सर्व्हे डेटाचं विशलेषण रिसर्च मध्ये समाविष्ट केलं आहे. त्यात सर्व महिलांनाही योग्य ती माहिती सुद्धा दिली ज्यात त्यांची डिलिव्हरी कोणत्या महिन्यात झाली आणि जर डिलिव्हरी वेळे आधी झाली तर त्याला किती वेळ होता या संदर्भात महिलांनी माहिती दिली असं डॉ. अमेलिया म्हणाल्या.

 

आणखी वाचा – Banana Benefits : कोणत्याही हंगामात एक ‘केळे’ खाण्याचे आहेत अनेक फायदे

मिसकॅरेज केव्हा आणि कसे होते –

– मिसकॅरेज प्रेगन्सीच्या सुरुवातीच्या २३ आठवड्यांमध्ये होते.

– त्यावेळी रक्तस्त्राव आणि पाटाच्या खालील भाग दुखू लागतो.

– सलग तीन पेक्षा जास्त वेळा जर मिसकॅरेज झालं असेल तर ती गोष्ट खूप गंभीर असते त्याचबरोबार १ टक्के महिलांनी तीन वेळा गर्भधारणेचा सामना केला
आहे.

आणखी वाचा – दिवसा झोपल्याने खरंच नुकसान होते का, काय सांगतं आयुर्वेद?

– यावर डॉक्टर असे म्हणत की जास्तीत जास्त मिसकॅरेज हे गर्भामध्ये असलेल्या मुलात जर का काही क्रोमोसोम्स असतील तर त्यामुळे होतात. जे खूप गंभीर आणि असामान्य आहे.

– डॉक्टर म्हणतात की मिसकॅरेज थांबवू शकत नाही पण जर का मद्यपान किंवा स्मोकिंग जर का केले गेले तर त्याचा धोका मिसकॅरेज होण्यासाठी जास्त असतो.

त्यामुळे गर्भवती स्त्रियांनी योग्य आहार, उत्तम मानसिक स्वस्थ सुद्धा जपलं पाहिजे. योग्य जातो व्यायाम सुद्धा केला पाहिजे त्याचबरोबर डॉक्टरांच्या सल्याने योग्य ती औषधं सुद्धा घेतली पाहिजेत.

त्याचबरोबर या संदर्भात कोणताही उपाय करायचा असेल किंवा औषधं घेतली तर ती तज्ज्ञांच्या सल्ल्यानेच करा.

 

nidhi pednekar
nidhi pednekarhttps://www.mymahanagar.com/author/nidhipednekar/
मागील ४ वर्षांपासून आकाशवाणीवर मुंबई येथे कंटेन्ट रायटर आणि अँकर म्हणून काम करण्याचा अनुभव, पॉलिटिकल पि.आर. मॅनेजमेंट क्षेत्रात काम करण्याचा अनुभव त्याचसोबत ललित, मनोरंजन, राजकीय घडामोडी, लाईफस्टाईल या विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -