सकाळची वेळ ही प्रत्येकाच्या आयुष्यात सकारात्मकता,ऊर्जा,काही करुन दाखवण्याची उमेद,आशा घेऊन येते. एकंदरीतच आयुर्वेदात सांगितल्या प्रमाणे उगवत्या सुर्या प्रमाणे सृदृढ,सुरक्षित,तेजोमय पद्धतीने माणसाचे दिवसाची सुरुवात करावी. अशातच सकाळी उठल्यावर प्रत्येकाने जीवनशैलीत बदल करुन काही चांगल्या सवयी अंगीकृत करायला हव्या. योग्य दिनचर्येचा अवलंब केल्यास शरीराल आवश्यक उर्जा प्राप्त होते. आज आपण आयुर्वेदात सांगितल्या प्रमाणे सकाळी उठल्यावर कोणत्या गोष्टी सर्वात आधी करायला हव्या याची माहिती जाणून घेणार आहोत.
मल,मुत्र विसर्जन करणे
सकाळी उठल्यावर सर्वातआधी शरीरातील मल,मुत्र विसर्जन करावे. यानंतर आपल्या गुप्त अंगास गरम पाण्याने स्वच्छ धुणे तसेच हात स्वच्छ करणे.
जीभेची स्वच्छता
आर्युवेदानुसार दररोज दात घासण्यासोबतच जीभेची देखील स्वच्छता करणे गरजेचं आहे. यामुळे जीभेवरील मृत पेशीच दुर होण्यास मदत मिळते.
मालिश करणे
दैनंदिन जीवनात दरोरज सकाळी डोक्याची तसेच शरीराची मालिश केल्यास मनावरील ताण कमी होतो.
दररोज व्यायाम करणे
आजच्या धावपळीच्या जगात स्वत:ला फिट ठेवण्यासाठी व्यायाम करणे गरजेचं आहे. यामध्ये मेडिटेशन, योगा यांचा देखील समावेश करावा. आर्युवेदानुसार एका आदर्श दिवसाची सुरूवत सुर्यनमस्कार करुन करावी. यामुळे तुमचा दिवस अत्यंत आनंदात जाऊ शकतो.
आर्युवेदिक चहा/काढा पिणे
सधारणत: अनेकजण सकाळी उठल्यावर चहा पिताता. यामुळे अनेकदा अपचन,ॲसिडीटीचा सामना करावा लागतो. कोणत्याही पाचक विषाक्त पदार्थांना शरीरातून बाहेर काढण्यासाठी लिंबू,अदरक,बडीशेप,लवंग,तुळस यासारख्या आरोग्यवर्धक वस्तूंचा वापर करुन त्याचे चहा किंवा काढा तयार करुन सेवन केल्यास आरोग्यासाठी हितकारक कठते.
पाणी पिणे
सकाळी उठल्यावर तांब्याच्या भांड्यातील पाणी प्या. यामुळे तुमच्या शरीरातील हानीकाराक विषाणूंचा नाश होतो.तसेच किडणीसाठी देखील हे सुरक्षित असल्याचे सांगितले जाते.
हे हि वाचा – Diabetes control tips:मधुमेहाची लक्षणे दिसल्यास करा ‘हे’ आयुर्वेदिक उपचार फॉलो