ज्योतिष शास्त्रामध्ये नावाला अत्यंत महत्त्व देण्यात आले आहे. मुलाच्या जन्मानंतर त्याच्या आई-वडीलांना खूप विचार करून मुलाचे योग्य नाव ठेवण्याचा सल्ला दिला जातो. कारण नावावरूनच व्यक्तीला समाजात ओळख मिळते. तसेच ते त्याच्या भविष्यासाठी देखील महत्त्वाचे असते. नावामुळे व्यक्तीच्या आयुष्यावर खूप प्रभाव पडतो. त्यामुळेच अनेकजण खूप विचार करून आपल्या मुलांचे अर्थपूर्ण नाव ठेवण पसंत करतात. ज्योतिषार्यांच्या मते नावाचे पहिले अक्षरही तितकेच महत्त्व पूर्ण असते. ‘या’ चार अक्षराच्या नावाचे व्यक्ती आयुष्यभर सुखी आणि लग्जरीयस आयुष्य जगतात.
ज्योतिष शास्त्रानुसार ज्या व्यक्तींच्या नावाची सुरूवात A किंवा अ अक्षरापासून होते, असे लोक खूप मेहनती असतात. आपल्या कष्टाने असंभव गोष्ट सुद्धा संभव करतात. ज्या व्यक्तीचे नावाची सुरूवात A किंवा अ अक्षरापासून सुरू होते. ते स्वभावाने खूप ईमानदार असतात. शिवाय त्यांना आयुष्यात कधीही पैश्यांची कमतरता भासत नाही.
ज्योतिष शास्त्रानुसार ज्या व्यक्तींच्या नावाची सुरूवात K किंवा क,ख अक्षरापासून होते, असे लोक स्वभावाने खूप सरळ असतात आणि हसरे सुद्धा असतात. यांच्यावर देवी लक्ष्मी आणि भगवान कुबेरांचा आर्शिवाद असतो. तसेच त्यांच्या आयुष्यात कधीही पैश्यांची कमतरता नसते.
ज्योतिष शास्त्रानुसार ज्या व्यक्तींच्या नावाची सुरूवात P किंवा प, फ अक्षरापासून होते,असे लोक खूप संस्कारी आणि मनमिळावू असतात. तसेच हे प्रत्येक व्यक्तीच्या भावनांची कदर करतात. हे व्यक्ती अनेकांना आपल्याकडे आकर्षित करून घेतात.
ज्योतिष शास्त्रानुसार ज्या व्यक्तींच्या नावाची सुरूवात S किंवा स, श अक्षरापासून होते, असे लोक कोणतेही काम करण्यासाठी मागे हटत नाहीत. त्यामुळेच हे लवकर सफल होतात. हे लोक आपल्या आयुष्यात खूप पैसा कमावतात आणि प्रत्येक सुख सुविधेचा आस्वाद घेतात.