स्वयंपाक घरातील मसाल्यांच्या मदतीने चविष्ठ पदार्थ बनवता येतात. परंतु हेच पदार्थ फक्त चविष्ठ पदार्थचं नाही तर तुम्हाला अनेक संकाटातून बाहेर येण्यास तसेच आर्थिक संकटातून बाहेर येण्यासाठी मदत करु शकतात.
स्वयंपाक घरातील ‘या’ पदार्थांपासून करा जीवनातील संकटांवर मात
हळद
हळदीमुळे तुम्ही तुमच्या जीवनातील अनेक दोष दूर करु शकता. दररोज अंघोळीच्या पाण्यात एक चिमूट हळद टाकून आंघोळ केल्याने आपले भाग्य जागृत होण्यास आणि आर्थिक संकटातून सुटका मिळण्यास मदत होते. वैवाहिक जीवनाशी संबंधित समस्यांसाठी, भगवान विष्णू आणि देवी लक्ष्मीच्या मूर्तीसमोर दररोज चिमूटभर हळद अर्पण केल्याने इच्छित जीवनसाथी मिळतो.
काळी मिरी
शनीच्या त्रासापासून मुक्ती मिळवण्यासाठी काळी मिरी आणि 11 रुपये काळ्या कपड्यात बांधून गरजू व्यक्तीला दान करा. काळ्या मिरीच्या या उपायाने शनिदेवाच्या त्रासातून सुटका होते.
वेलची
करिअरमधील अडथळे दूर करण्यासाठी रात्री झोपताना उशीखाली वेलची ठेवावी आणि सकाळी घरातून बाहेर पडताना एखाद्या गरजू व्यक्तीला द्यावी. असे केल्याने तुम्ही नोकरी किंवा करिअरशी संबंधित समस्यांपासून मुक्त होऊ शकता.
लवंग
आर्थिक अडचणींपासून मुक्ती मिळवण्यासाठी आणि तुमचे नशीब बळकट करण्यासाठी लवंग खूप उपयोगी आहे. लवंगाच्या उपायाने राहू-केतूचा वाईट प्रभाव कमी करता येतो. दर शनिवारी लवंग दान केल्याने राहु
ची अशुभ प्रभाव नष्ट होतो आणि घरात समृद्धी येते.
मीठ
प्रत्येक शनिवारी घर मिठाच्या पाण्याने पुसून घ्या, यामुळे आर्थिक समस्या दूर होते. तसेच काचेच्या ग्लासमध्ये मीठ ठेवून बाथरूममध्ये ठेवल्याने सूक्ष्म जंतू नष्ट होतात आणि वाईट शक्ती दूर होते.
हेही वाचा :