२०१४मध्ये आलेल्या मोदी लाटेमध्ये आणि अच्छे दिनच्या वायद्यामध्ये नरेंद्र मोदींनी भारताला मोठ्या आघाडीसह विजय मिळवून दिला. मात्र, २०१९पर्यंत त्यांचा करिष्मा कमी झाल्याचं वातावरण तयार झालं आहे. तो कमी झाला किंवा नाही, यापेक्षा देखील तो कमी झाल्याचं वातावरण तयार होणं मोदींसाठी जास्त त्रासदायक ठरू शकतं. जसं काँग्रेसचं सरकार जाणारच असं वातावरण २०१४मध्ये तयार झालं होतं!