भाईंदर :- मीरा- भाईंदर महानगरपालिकेचा २०२४ – २५ या आर्थिक प्रशासकीय काळातील २ हजार २९७ कोटी ९४ लाख ८६ हजार रूपयांचा वर्षाचा दुसरा अर्थसंकल्प पालिका आयुक्त संजय काटकर यांनी सादर केला. त्यात मागील वर्षाचा अर्थसंकल्प २३ लाख रुपये शिल्लक ठेवून १६ फेब्रुवारी रोजी शुक्रवारी सादर करण्यात आला. त्यात शहराची सूर्या धरणातून पाणी पुरवठा व्यवस्था व मलनिस्सारण केंद्रे, नवीन सिमेंट रस्ते, पर्यावरण संरक्षण व महापालिकेच्या शालेय शिक्षण डिजिटल शाळा, आरोग्य, परिवहन विभागात १५७ नवीन ई- बस खरेदी आणि पहिल्यांदाच स्थावर मालमत्ता विभाग यांचा ५ कोटी ८३ लाख उत्पन्न यासाठी भरीव निधीची तरतूद करत अर्थसंकल्पात करण्यात आली आहे. गेल्या वर्षी पेक्षा या वर्षीच्या अर्थसंकल्पात ५.७ टक्क्यांनी वाढ केली आहे.
शहराची पाणी टंचाईवर कायमची मात करण्यासाठी अमृत योजना २.० अभियांना अंतर्गत २१७ कोटी ५० लाखांचा निधीं आणि मलनिस्सारण प्रकल्पास ४१७ कोटी ४८ लाख, घनकचरा व्यवस्थापन विभागासाठी दैनंदिन साफसफाई १७० कोटी, नालेसफाईसाठी ३ कोटी ६७ लाखांची तरतूद, घनकचरा कचरा व्यवस्थापनासाठी १३ कोटी, तलाव पुनर्जीवित करण्यासाठी ३ कोटी ५८ लाख, शहरातील प्रमुख ३७ सिमेंट रस्त्यांसाठी कर्ज ५४१ कोटी ५८ लाख आणि त्यात महापालिकेचा १५० कोटी हिस्सा, हिंदू हृदयसम्राट कलादालन २ कोटी ५० लाख, घोडबंदर किल्ला संवर्धन आणि नूतनीकरण १० कोटी, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन ७ कोटी ५० लाख, विद्युत शवदाहिनी व गॅस शवदाहिनीसाठी २ कोटी ७५ लाख, अग्निशमन केंद्र ३ कोटी आणि ७२२ कोटी कर्ज व अनुदान १५० कोटी असे मिळून एकूण ८७२ कोटी, दिव्यांग कल्याणकारी योजना १० कोटी ६५ लाख, परिवहन सेवेसाठी ४५ कोटी, उद्याने, मैदाने, दुभाजके विकसित करून सुशोभिकरण करून त्याचा विकास करण्यासाठी ५९.५१ कोटी, नगररचना भूसंपादन ५१ कोटी, पर्यावरण विभागासाठी २७ कोटी १३ लाख आणि संगणक विभाग १५ कोटी ४७ लाखांची खर्चा करता तरतूद करण्यात आली आहे. शिक्षणासाठी ५५ कोटी ५७ लाख आणि त्यात १२ कोटी २५ लाख शाळा मजबूत करण्यासाठी आणि १ कोटी सीबीएसई बोर्डची शाळा चालू करण्यासाठी तरतूद करण्यात आली आहे. त्यासोबतच कोणतीही नविन कर वाढ किंवा दर वाढ न-करून सर्वसामान्य जनतेला दिलासा देण्यात आला आहे. सदर प्रसंगी अतिरिक्त आयुक्त डॉ. संभाजी पानपट्टे, अनिकेत मानोरकर, उपायुक्त संजय शिंदे, रवी पवार, कल्पिता पिंपळे, मुख्य लेखाधिकारी कालिदास जाधव, शहर अभियंता दिपक खांबीत, मुख्यलेखा परीक्षक सुधीर नाकाडी, नगरसचिव वासुदेव शिरवळकर व महापालिका अधिकारी उपस्थित होते.
अर्थसंकल्पातील महत्वाचे मुद्दे
दैंनदिन स्वच्छता व नालेसफाई यांच्याकरिता – १७० कोटी ,रुग्णालये दवाखाने – ८३ कोटी ४३ लाख
पाणी पुरवठा, जल निसारण व मलनिस्सारण – ४३३.१० कोटी, सूर्या प्रादेशिक पाणी पुरवठा योजना व जमिनी भूसंपादन करण्यासाठी – ५१ कोटी, शिक्षण विभाग – ५५ कोटी ५७ लाख, उद्याने विकास खर्च – ५९ कोटी ५१ लाख, परिवहन सेवा – ४५ कोटी, भुयारी गटारे योजना – ३९ कोटी २० लाख, महिला व बालकल्याण विभाग – ६ कोटी ५८ लाख, दिव्यांग कल्याणकारी योजना – १० कोटी ६५ लाख, विकास कामांसाठी घेतलेल्या कर्जाची परतफेड निधी – ५९ कोटी ३६ लाख.