Homeमहामुंबईपालघरमहिला संरक्षणासाठी तक्रार निवारण समिती गठीत करा

महिला संरक्षणासाठी तक्रार निवारण समिती गठीत करा

Subscribe

अधिनियम कलम 26 मध्ये जर एखाद्या मालकाने अंतर्गत तक्रार समिती स्थापन केली नाही आणि कायद्यातील व नियमातील विविध तरतुदींचे व जबाबदार्‍यांचे पालन न केल्यास मालकाला पन्नास हजार रुपयांपर्यंत दंड होईल.

विरार : कामाच्या ठिकाणी महिलांच्या होणार्‍या लैंगिक छळापासून संरक्षण (प्रतिबंध, मनाई व निवारण) अधिनियम 2013 च्या तरतुदीनुसार 10 किंवा 10 पेक्षा अधिक कर्मचारी असलेल्या प्रत्येक आस्थापनामध्ये महिला तक्रार निवारण समिती असणे आवश्यक आहे. त्यामुळे सर्व शासकीय, निमशासकीय, सार्वजनिक, खासगी आस्थापनांनी सदर समितीचे गठण करावे असे आवाहन, जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी मलीनाथ कांबळे यांनी केले आहे. शासकीय, निमशासकीय, संघटना, महामंडळे, आस्थापना, स्थानिक प्राधिकरण, शासकीय कंपनी, नगरपरिषद किंवा सहकारी संस्था अशा सर्व आस्थापना, तसेच कोणतेही खासगी क्षेत्र, संघटना किंवा खासगी उपक्रम ,संस्था, एंटरप्रायजेस, अशासकीय संघटना, सोसायटी, ट्रस्ट, उत्पादक, पुरवठा, वितरण आणि विक्री यांसह वाणिज्य, व्यावसायिक, शैक्षणिक, करमणूक, औद्योगिक, आरोग्य सेवा किंवा वित्तीय कामकाज पार पाडणारे युनीट किंवा सेवा पुरवठादार, रुग्णालय, सुश्रूषालय, क्रीडा संस्था, प्रेक्षागृहे, क्रीडा संकुले आदी ठिकाणी किंवा आदी नियमात नमूद केलेल्या कामाच्या शासकीय आणि खासगी क्षेत्रातील कार्यालयाच्या ठिकाणी शासन निर्णयाप्रमाणे अंतर्गत तक्रार निवारण समिती गठीत करणे बंधनकारक आहे.

मालकाला पन्नास हजार रुपयांपर्यंत दंड

अधिनियम कलम 26 मध्ये जर एखाद्या मालकाने अंतर्गत तक्रार समिती स्थापन केली नाही आणि कायद्यातील व नियमातील विविध तरतुदींचे व जबाबदार्‍यांचे पालन न केल्यास मालकाला पन्नास हजार रुपयांपर्यंत दंड होईल. दुसर्‍यांदा आढळल्यास परवाना रद्द करून दुप्पट दंड आकारण्यात येईल. तरी पालघर जिल्हयातील सर्व आस्थापनांनी अंतर्गत तक्रार निवारण समिती गठीत करुन तसा अहवाल जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालय येथे पुढील पत्त्यावर प्रशासकीय इमारत ’अ’ कक्ष क्र.108 जिल्हाधिकारी कार्यालय परिसर, पालघर येथे तात्काळ सादर करावा, तसेच सदरचा अहवाल जिल्हा महिला व बालविकास अधिकारी कार्यालयाच्या [email protected] या मेल आयडीवर पाठविण्यात यावा, असे आवाहन मलीनाथ कांबळे यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.


Edited By Roshan Chinchwalkar