HomeमहामुंबईपालघरMinister Ganesh Naik: पालघर जिल्हा होणार चौथी मुंबई

Minister Ganesh Naik: पालघर जिल्हा होणार चौथी मुंबई

Subscribe

डहाणू महोत्सवाचे हे तिसरे वर्ष असून पहिल्या वर्षी दीड लाख नागरिकांनी या फेस्टिवलमध्ये सहभाग घेतला होता. दुसर्‍या वर्षी ही संख्या वाढली होती. यावर्षी पाच लाख नागरिक या महोत्सवामध्ये सहभाग नोंदविणार असा विश्वास वनमंत्री तथा पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री गणेश नाईक यांनी व्यक्त केला.

विरार : डहाणू महोत्सवाचे हे तिसरे वर्ष असून पहिल्या वर्षी दीड लाख नागरिकांनी या फेस्टिवलमध्ये सहभाग घेतला होता. दुसर्‍या वर्षी ही संख्या वाढली होती. यावर्षी पाच लाख नागरिक या महोत्सवामध्ये सहभाग नोंदविणार असा विश्वास वनमंत्री तथा पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री गणेश नाईक यांनी व्यक्त केला. डहाणू तालुका हा चिकूसाठी जगप्रसिद्ध आहे. तसेच या डहाणू महोत्सवाला जिल्ह्यातील जनसामान्यांचा मोठा पाठिंबा मिळणार असून हा जिल्हा आणि आसपासचा परिसर चौथी मुंबई होणार असून उंच भरारी घेणार आहे, असे प्रतिपादन पालकमंत्री गणेश नाईक यांनी केले. डहाणू येथील सिव्यू पार्क, डहाणू-आगर रोड येथे डहाणू नगरपरिषद यांच्यावतीने आयोजित डहाणू पर्यटन महोत्सव 3.0 चे उद्घाटन पालकमंत्री गणेश नाईक यांच्या हस्ते झाले. या कार्यक्रमास आमदार विनोद निकोले,आमदार राजेंद्र गावित, आमदार हरिश्चंद्र भोये, माजी आमदार आनंदभाई ठाकूर, जिल्हाधिकारी गोविंद बोडके, पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील, डहाणू नगर परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अक्षय गुडदे ,सहाय्यक वनसंरक्षक प्रियांका पाटील आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.

पालघर जिल्ह्यात वाढवण बंदर हे देशाचे नाव उज्वल करणारे असे बंदर होणार आहे. त्यामुळे येथील स्थानिकांना रोजगार उपलब्ध होणार असून आर्थिक चालना मिळणार आहे. तसेच या महोत्सवात विविध बचत गट व इतर असे एकूण 200 स्टॉल लावण्यात आले आहेत. तसेच इतर खाद्यपदार्थांचेही स्टॉल असल्याने पर्यटकांना मनमुरादपणे खाद्यपदार्थांचा आस्वाद घेता येणार आहे. गेल्या महोत्सवात 3 लाख पर्यटकांनी भेट दिली होती. यावर्षी ही संख्या 5 लाखापर्यंत जाईल याची मला खात्री आहे. तर या महोत्सवाला सर्व स्थानिकांनी आणि इतर पर्यटकांनी भेट द्यावी, असे आवाहन पालकमंत्री गणेश नाईक यांनी केले.


Edited By Roshan Chinchwalkar