घरमहाराष्ट्रदहावी-बारावीचा निकाल लांबण्याची चिन्हे

दहावी-बारावीचा निकाल लांबण्याची चिन्हे

Subscribe

कर्मचारी संपाचा उत्तरपत्रिका तपासणीला फटका, ७५ लाख उत्तरपत्रिका तपासणीविना पडून

जुन्या पेन्शन योजनेच्या मागणीसाठी मागील चार दिवसांपासून संपावर गेलेले शासकीय-निमशासकीय कर्मचारी तसेच शिक्षकांच्या संपाचा फटका उत्तरपत्रिका तपासणीलाही बसत आहे. कर्मचार्‍यांचा संप कायम राहिल्यास दहावी-बारावी परीक्षेच्या ७५ लाख उत्तरपत्रिका तपासणीविना पडून राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे दहावी-बारावी बोर्डाचा निकाल लांबण्याची चिन्हे आहेत, अशी माहिती बोर्डाच्या सूत्रांनी दिली आहे.

बारावीची परीक्षा २१ फेब्रुवारीपासून सुरू झाली असून ती २० मार्चपर्यंत सुरू असणार आहे, तर दहावीची परीक्षा २ मार्चपासून सुरू झाली असून २५ मार्चपर्यंत सुरू असणार आहे. जुन्या पेन्शनच्या मागणीसाठी राज्य सरकारी कर्मचारी आणि शिक्षक १४ मार्चपासून बेमुदत संपावर गेले आहेत. संपकाळात उत्तरपत्रिका न तपासण्याचा पवित्रा राज्य सरकारी, निमसरकारी, शिक्षक, शिक्षकेतर समन्वय समितीने घेतला आहे. हे शिक्षक केवळ बारावीच्या परीक्षाविषयक कार्य करीत आहेत. इतर कोणतेही कार्य करणार नाहीत, असेही समितीने स्पष्ट केले आहे.

- Advertisement -

दरवर्षीच्या नियोजनाप्रमाणे बारावी बोर्ड परीक्षेचा निकाल मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात आणि दहावी बोर्ड परीक्षेचा निकाल जून महिन्याच्या पहिल्या किंवा दुसर्‍या आठवड्यात जाहीर होणे अपेक्षित असते, परंतु संपकाळात उत्तरपत्रिका तपासून न झाल्यास निकाल लागण्यासाठी किमान एक आठवड्याचा विलंब होऊ शकतो, अशी माहिती बोर्डातील सूत्रांनी दिली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -