राज्यात वाढत्या कोरोनाबाधितांप्रमाणे कोरोनामुक्त होणाऱ्या रुग्णांची संख्या देखील वाढत आहे. राज्यात आज पुन्हा एकदा नवीन रुग्णांपेक्षा बरे झालेल्या संख्या अधिक आहे. गेल्या २४ तासांत राज्यात ११ हजार १५ नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले असून २१२ रुग्णांच्या मृत्युची नोंद झाली आहे. त्यामुळे राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या ६ लाख ९३ हजार ३९८वर पोहोचली आहे. यापैकी आतापर्यंत २२ हजार ४६५ रुग्ण मृत्युमुखी पडले आहेत. तसेच आज १४ हजार २१९ रुग्ण बरे होऊन घरी गेले असून राज्यात आतापर्यंत एकूण ५ लाख २ हजार ४९० रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. यामुळे राज्यातील कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ७२.४७ टक्के एवढे झाले आहे. (सविस्तर वृत्त थोडाच वेळात)
11,015 new #COVID19 cases and 212 deaths reported in Maharashtra today. The total number of positive cases now stands at 6,93,398 including 5,02,490 recoveries and 1,68,126 active cases: State Health department pic.twitter.com/QtERiuzQoL
— ANI (@ANI) August 24, 2020