राज्यात गेल्या २४ तासांत १४ हजार ४९२ नव्या रूग्णांची भर पडली असून २९७ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. त्यामुळे राज्यातील कोरोनाबाधितांची एकूण संख्या ६ लाख ६१ हजार ९४२ इतकी झाली आहे. तर ४ लाख ८० हजार ११४ जणांनी कोरोनावर मात केली आहे. दरम्यान, गेल्या २४ तासांत ९ हजार २४१ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत, अशी माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे. तसेच राज्यातील एकूण कोरोना रुग्णांची संख्या २१ हजार ९९५ इतकी झाली असून मृत्यूदर ३.२७ टक्के इतका झाला आहे. आतापर्यंत तपासण्यात आलेल्या ३५ लाख ६६ हजार २८८ चाचण्यांपैकी ६ लाख ७१ हजार ९४२ अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत.
14,492 new #COVID19 cases and 297 deaths reported in Maharashtra today. The total number of positive cases now stands at 6,61,942 including 4,80,114 recoveries and 1,69,516 active cases: State Health department pic.twitter.com/JeTefkG6u4
— ANI (@ANI) August 22, 2020
राज्यात तब्बल ९ हजार २४१ रुग्ण कोरोनामुक्त झाले असून त्यामुळे राज्यात आजपर्यंत एकूण ४ लाख ८० हजार ११४ लोकांनी कोरोनावर मात केली आहे. तर, राज्याचा रिकव्हरी रेट ७१. ४५ टक्के इतका झाला आहे. सध्या राज्यात १२ लाख ११ हजार ६०८ व्यक्ती होम क्वारंटाइनमध्ये असून ३५ हजार ३७१ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाइनमध्ये आहेत.
हेही वाचा –
दाऊदचा ठावठिकाणा लागला; पाकिस्तानच्या व्हाइट हाऊसमध्ये लपून बसलाय